शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

CoronaVirus: “मोदी सरकाने आधी अधिकार घेतले, आता हात झटकतायत; काहीच नियोजन नाही”  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 3:45 PM

CoronaVirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी एकटे कोरोनाशी लढू शकत नाहीत, असा खोचक टोला लगावण्यात आला आहे.

ठळक मुद्देमोदी सरकाने आधी अधिकार घेतले, आता हात झटकतायतहिंसेचं कोणीच समर्थन करत नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी एकटे कोरोनाशी लढू शकत नाहीत - मलिक

मुंबई: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत असताना कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोना उद्रेकामुळे कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यावरून केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांसमोर उभे ठाकले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. केंद्र सरकारने आधी अधिकार घेतले आणि परिस्थिती हाताबाहेर जात असताना केंद्र हात झटकत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. (coronavirus ncp nawab malik criticised pm modi and centre govt over corona situation)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. कोरोनाचे संकट मोठे आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलवायला हवी. त्यातून मार्ग काढाणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकटे कोरोनाशी लढू शकत नाहीत, असा खोचक टोला मलिक यांनी लगावला.  

कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका; सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला सुनावलं

आधी अधिकार घेतले, आता हात झटकतायत

विरोधक जे बोलत होते, तेच आता भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी बोलत आहेत. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा मोठा तुडवडा आहे. पंतप्रधान मोदींचे काहीच नियोजन नाही. आधी अधिकार घेतले आणि परिस्थिती हाताबाहेर जात असताना केंद्र हात झटकत आहे, असा आरोप मलिक यांनी केला आहे. तसेच पॉझिटिव्ह रेट केवळ गोवा नाही, तर यूपीतही सारखाच आहे. लाखो रुग्ण आपले प्राण गमावतील, अशी परिस्थिती आहे. माझी मागणी आहे. सर्व देशातील नेत्यांची बैठक पंतप्रधान मोदी यांनी बोलवावी आणि परिस्थिती समजून घ्यावी. विदेशातून येत असलेल्या सामानाने वाटपही होत नाही, असा दावाही यावेळी मलिक यांनी केला.

“नवीन संसद भवनाचं काम पुढे ढकलून लसीकरणाकडे लक्ष देण्यासाठी पाठपुरावा करा”; पवारांचा भाजपला टोला

हिंसेचं कोणीच समर्थन करत नाही

भाजप फेक व्हिडिओ शेअर करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची बदनामी करत आहेत. बंगालमधील हिंसेच कोणीच समर्थन करत नाही. किसान सम्मान निधी देऊ अशी घोषणा भाजपने केली होती. आता ममता दिदींनी तत्काळ तो निधी देण्याची मागणी केली आहे. आता केंद्राची जबाबदारी आहे, असे मलिक यांनी सांगितले. याशिवाय, रवींद्रनाथ टागोर यांची जयंती सर्वजण साजरी करत आहेत. टागोर हे जाती, धर्माच्या पालिकडे होते. पंतप्रधान मोदींनी हा लूक बंगाल निवडणुकीसाठी केला होता. आता त्यांनी त्यांचे विचारही घेतले पाहिजे, असा चिमटा मलिक यांनी काढला. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याNCPराष्ट्रवादी काँग्रेसnawab malikनवाब मलिकprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण