शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

मोठी बातमी! काँग्रेस नेत्यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट; महाविकास आघाडीत नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 2:37 PM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

ठळक मुद्देराज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी या चर्चेसाठी काँग्रेसच्या नेत्यांनी ही भेट घेतलीफडणवीसांनी काँग्रेससमोर आणखी एक प्रस्ताव ठेवला तो काँग्रेस मान्य करणार का? काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील आणि भाजपाचे संजय उपाध्याय यांनी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज भरले

मुंबई – राज्यातील राजकारणात पुन्हा एक मोठी घडामोड घडली आहे. राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाने संजय उपाध्याय यांना संधी दिली आहे तर महाविकास आघाडीकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. परंतु त्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं विविध चर्चांना उधाण आलं आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी या चर्चेसाठी काँग्रेसच्या नेत्यांनी ही भेट घेतली. परंतु या भेटीमुळे महाविकास आघाडीतील इतर दोन पक्ष नाराज झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीच्या एकीवर काँग्रेसला विश्वास नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काँग्रेस नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानं शिवसेना-राष्ट्रवादीला हे रुचलं नाही.

राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं काँग्रेसला वाटतं म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. परंतु फडणवीसांनी काँग्रेससमोर आणखी एक प्रस्ताव ठेवला तो म्हणजे मागील अधिवेशनात भाजपाचे १२ आमदार निलंबित करण्यात आले आहेत. या आमदारांचे निलंबन रद्द करावं असा प्रस्ताव फडणवीसांनी काँग्रेसला दिला आहे. परंतु हा निर्णय महाविकास आघाडीचा आहे. काँग्रेस एकटी यावर निर्णय घेऊ शकणार नाही. परंतु फडणवीसांनी हा प्रस्ताव देऊन काँग्रेसची गोची केली आहे. तर काँग्रेसला महाविकास आघाडीच्या संख्याबळावर विश्वास नाही का? असं इतर पक्षातील नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत नाराजी पसरल्याची माहिती आहे.

काँग्रेस-भाजपामध्ये लढत

काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील आणि भाजपाचे संजय उपाध्याय यांनी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज भरले. ही निवडणूक ४ ऑक्टोबरला होणार आहे. महाविकास आघाडीकडे निर्भेळ बहुमत आहे आणि रजनी पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले पण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप व मित्रपक्षांचे बळ ११९ असून आणखी २०-२५ आमदार आमच्याकडे येऊ शकतात, असा दावा केल्यानं खळबळ माजली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNana Patoleनाना पटोलेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना