शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

महायुती सरकार घालवणे हेच प्राधान्य, मुख्यमंत्रीपदाचा विषय महत्त्वाचा नाही: बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 22:05 IST

Congress Balasaheb Thorat News: चांगले सरकार देणे ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय आम्ही योग्यवेळी करू, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

Congress Balasaheb Thorat News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण, यावरून महाविकास आघाडीत एकमत होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने सकारात्मक प्रतिसाद दिलेला दिसत नाही. यातच आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही महायुती सरकार घालवणे हेच प्राधान्य असल्याचे म्हटले आहे. 

मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत आताच आग्रह धरण्यात काही अर्थ नाही. मुख्यमंत्रिपदाबाबतीत महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल. आकड्यांच्या आधारावर विधानसभा निवडणुकीननंतर महाविकास आघाडीचा कोण होणार हे ठरणार आहे. मुख्यमंत्री कोण? हे आता महत्त्वाचे नाही. सध्या महाविकास आघाडीला बहुमत मिळेल अशी स्थिती आहे. तसे वातावरण राज्यात आहे. तसेच, लोकांच्या पाठिंब्यानंतर एक स्थिर सरकार देणे महत्त्वाचे आहे. स्थिर सरकार देणे, हे आमचे उद्दिष्ट्य आहे, असे शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत बाळासाहेब थोरात यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.

मुख्यमंत्रीपदाचा विषय फार महत्त्वाचा नाही

पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, मुख्यमंत्रीपदाचा विषय फार महत्त्वाचा नाही. त्याबाबत आम्ही एकत्र बसवून ठरवू. संविधानविरोधी जे सरकार आहे, कायद्याप्रमाणे न बनलेले, अनेक गोष्टींची चर्चा झाली. खोक्यांची चर्चा झाली, भ्रष्टाचाराची चर्चा झाली, हा प्रकार थांबवणे आणि महायुतीचे सरकार घालवणे हेच प्राधान्य आहे. चांगले सरकार देणे ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय आम्ही योग्यवेळी करू, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, शरद पवार चुकीचे काय बोलले, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकीला पुढे जाणार आहोत. महाविकास आघाडीचे संख्याबळ आल्यानंतरच तिथे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवला जाईल. मविआच्या मेळाव्यात आम्ही उद्धव ठाकरेंच्या मागणीवर बोललोय. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ, असे नाना पटोले म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेस