शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅशलेस’ची क्रेझ

By admin | Updated: January 1, 2017 02:17 IST

जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या गुमथी येथील तरुणांमध्ये ‘कॅशलेस’ची जबदरस्त क्रेझ आहे. गावातील ५० टक्के नागरिकांकडे

कोराडी (नागपूर) : जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या गुमथी येथील तरुणांमध्ये ‘कॅशलेस’ची जबदरस्त क्रेझ आहे. गावातील ५० टक्के नागरिकांकडे स्मार्ट फोन असून, ‘कॅशलेस’च्या दिशेने त्यांनी पाऊल टाकले आहे. गेल्या दीड महिन्यात गावातील मोठे आर्थिक व्यवहार ‘कॅशलेस’ झाले असून, याची टक्केवारी ९ आहे. यासाठी नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग, आरटीजीएस व चेक हा पर्याय नागरिकांनी स्वीकारला आहे. गावातील किरकोळ आर्थिक व्यवहार रोखीनेच केले जात आहेत. मात्र, तांत्रिक सुविधांअभावी त्यात अडचणी येत आहेत.गाव : गुमथीगावचे नाव : गुमथी, ता. कामठी, जि. नागपूरजिल्ह्याच्या ठिकाणापासून अंतर : १५ किलोमीटर.बॅँक/ पतसंस्थांची संख्या : एकही नाही.पोस्ट आॅफिस : आहेएटीएम केंद्र : नाही.वाहतूक सुविधा : एसटी बस जात नाही, खासगी वाहने.वीजपुरवठा : वीजपुरवठा अखंडित.इंटरनेट सुविधा : आहे.कनेक्टिव्हिटी : अधूनमधून तुटते.दोन महिन्यांत कॅशलेस व डिजिटल व्यवहार वाढले का? : किरकोळ प्रमाणातपरंपरागत पद्धतीने व्यवहार करणाऱ्या खातेदारांना कॅशलेस व्यवहाराचे फायदे, विश्वासार्हता पटवून देण्यासाठी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. नवीन पिढी कॅशलेससाठी सकारात्मक आहे. - अंजली आशिष मोरे, उपसरपंच, गुमथी.गुमथी ग्रामपंचायत कार्यालयात वाय-फायच्या माध्यमातून विनामूल्य इंटरनेटसेवा उपलब्ध आहे, परंतु कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने अनेक अडचणी येतात. कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी इंटरनेट क्षमता वाढवावी, तसेच इंटरनेट सेवा मोफत द्यावी.- गौतम मानवटकर, नागरिक, गुमथी.कॅशलेस व्यवहार सोयीचे असले, तरी त्यासाठी लागणारी संसाधने व तंत्रज्ञान ग्रामीण भागात उपलब्ध नसल्याने अडचणी येतात. गावातील लहान आर्थिक व्यवहार करताना समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे गावामध्ये कॅशलेस व्यवहार त्रासदायक ठरत आहेत. - नलिनी ढोक, सरपंच, गुमथीगावातील भाजीविक्रेते, शेतमजूर, न्हावी, किराणा दुकानदार यांच्याशी केले जाणारे आर्थिक व्यवहार रोख रकमेत करण्याची सवय पडली आहे. जनधन योजनेंतर्गत बँकेत खाते उघडले असले, तरी अनेकांना बँकिंग व्यवहार करण्याची सवय नाही. बँकिंग व्यवहाराची सवय नसल्याने कॅशलेसमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. - सुधाकर तकीत, नागरिक, गुमथी.कॅशलेस व्यवहारांमुळे तरुण मंडळी उत्साहित आहेत. कारण बहुतांश तरुण स्मार्ट फोनचा वापर मोठ्या करतात. त्यामुळे ते फोनवरून सहज आर्थिक व्यवहार करतात. शेतकरी व शेतमजुरांना मात्र वेळेचा अभाव व पुरेसे ज्ञान नसल्यामुळे कॅशलेस व्यवहास करण्यात अडचणी येत आहेत.- विश्वेश्वर बोलधने, नागरिक, गुमथी.