शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या नितेश राणेंना मंत्रिपद, पण शिवसेनेच्या केसरकरांचा पत्ता का कापला? एक गोष्ट स्पष्ट झाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 08:41 IST

Cabinet Expansion: मोदींशी आपले चांगले संबंध, मोदींनी आपल्याला भाजपात येण्याची ऑफर दिलेली असे छातीठोकपणे सांगणाऱ्या केसरकरांचे नाव मात्र मंत्रिपदाच्या अंतिम यादीतून वगळण्यात आल्याने जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

राज्यात पश्चिम महाराष्ट्राला सर्वाधिक मंत्रिपदे देण्यात आली आहेत. त्या खालोखाल विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणाला प्रत्येकी आठ मंत्रिपदे मिळाली आहेत. शिंदे सरकारमधील जवळपास १२ मंत्र्यांचा पत्ता कापण्यात आला आहे. पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीने ४२ मंत्र्यांना शपथ देत जम्बो मंत्रिमंडळ स्थापन केले आहे. अशातच तळकोकणात भाजपाच्या नितेश राणेंना मंत्रिपद देत, शिवसेनेच्या दिपक केसरकरांचा पत्ता का कापण्यात आला, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. 

कोकणात एक योगायोग बनला आहे. राणे आणि सामंत बंधूं हे सलग चार मतदारसंघातून निवडून आले आहेत. यापैकी धाकटे बंधू यापूर्वी आमदार होते, तर ज्येष्ठ बंधू हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. मंत्रिपदाच्या शर्यतीत धाकट्यांनी बाजी मारली आहे. आता या राणे आणि सामंत यांना कोणती मंत्रिपदे मिळणार याबाबतची उत्सुकता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गकरांना लागून राहिली आहे. 

इकडे भाजपाने नितेश राणेंना मंत्रिपद देताना शिवसेनेने सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांना पुन्हा मंत्री केलेले नाही. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात दिपक केसरकर यांना शालेय शिक्षण मंत्री करण्यात आले होते. तसेच शिवसेनेचे प्रवक्ते देखील होते. परंतू, सिंधुदुर्गमध्ये त्यांना पालकमंत्री करण्यात आले नव्हते. राणेंशी असलेले तणावाचे संबंध याला कारणीभूत होते. लोकसभा निवडणुकीत केसरकर आणि राणे यांनी पुन्हा सख्य दाखवले, ते विधानसभेपर्यंत तसेच होते. शिंदेंच्या बंडावेळी वेळोवेळी मांडलेल्या भुमिकेमुळे मंत्रिपदाबाबत केसरकर देखील आश्वस्त होते. परंतू, मुख्यमंत्री पदावरून नाराज असलेल्या शिंदेंनी गाव गाठले तेव्हा केसरकर शिंदेंना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी शिंदेंनी केसरकर यांना भेट नाकारली होती. मोदींशी आपले चांगले संबंध, मोदींनी आपल्याला भाजपात येण्याची ऑफर दिलेली असे छातीठोकपणे सांगणाऱ्या केसरकरांचे नाव मात्र मंत्रिपदाच्या अंतिम यादीतून वगळण्यात आल्याने जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

एक स्पष्ट झाले...कणववलीतून आमदार झालेले नितेश राणे हे भाजपाचे आमदार आहेत. तिसऱ्यांदा ते आमदार झालेले आहेत. केसरकर सावंतवाडी मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार झाले आहेत. राज्य मंत्री असलेले केसरकर जेव्हा फडणवीस सरकारमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा राणे आणि केसरकर वाद चांगलाच रंगला होता. २०१९ मध्ये ठाकरे सरकारमध्ये केसरकर यांना मंत्रिपद देण्यात आले नव्हते. शिंदेंच्या बंडानंतर केसरकर यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते. परंतू तेव्हा राणे भाजपात असल्याने केसरकर यांना सिंधुदूर्गचे पालकमंत्री करण्यात आले नव्हते. डोंबिवलीच्या रविंद्र चव्हाण यांना जिल्ह्यात पाठविण्यात आले होते. आता नितेश राणेंना मंत्री करून, तसेच केसरकर यांना डावलून सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वादावर तोडगा काढण्यात आल्याची चर्चा होत आहे. तसेच मोठ्या काळानंतर सिंधुदूर्गचाच आमदार जिल्ह्याचा पालकमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Nitesh Raneनीतेश राणे Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदे