शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

ठाकरे सरकारमधील नेत्यांना झालेला कोरोना खरा आहे की राजकीय; नितेश राणेंचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 5:29 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच एक मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. राज्यात लॉकडाऊन आणि नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच मुंबईतही लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारवर नितेश राणेंची जोरदार टीकासरकारकडे भाजपच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत - नितेश राणेहिंदूविरोधी सामना वाचायचा आम्ही बंद केला - नितेश राणे

सिंधुदुर्ग : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच एक मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. राज्यात लॉकडाऊन आणि नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच मुंबईतही लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारमधील नेत्यांना झालेला कोरोना खरा आहे की राजकीय, असा सवालही नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. (bjp leader nitesh rane criticises on uddhav thackeray government over corona infection)

गेल्या दीड वर्षात राज्याच्या कानाकोपऱ्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे फिरत होते. आतापर्यंत त्यांना कधीही कोरोना झाला नाही. अधिवेशनाला आठ दिवस शिल्लक असतानाच त्यांना कोरोना झाला. छगन भुजबळांनाही नेमका सकाळीच झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील कुटुंबासोबत संवाद यात्रेसाठी राज्यभर फिरत आहेत. त्यांना आतापर्यंत कोरोना झाला नव्हता, तोही काही दिवसांपूर्वी झाला. म्हणून हा एक वेगळ्या प्रकारचा कोरोना महाराष्ट्रात आला नाही ना असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. 

"संजय राऊत, अर्थशास्त्र याचा काडीचाही संबंध नाही, असल्यास तो केवळ टक्केवारीशी"

भाजपच्या प्रश्नांना उत्तरे नाहीत

एक मार्चला अधिवेशन आहे आणि गेल्या आठ दिवसांमध्ये मंत्र्यांना कोरोना होण्याच्या बातम्या येत आहेत. राज्यभर फिरणाऱ्या मंत्र्यांना आठ दिवसांमध्ये झालेला हा कोरोना खरा आहे की, हा राजकीय कोरोना आहे? आगामी अधिवेशनात भारतीय जनता पक्षाच्या प्रश्नांना द्यायला यांच्याकडे उत्तर नाही. म्हणून राज्य सरकार कोरोनाचा आसरा घेत नाही ना हा प्रश्न माझ्या मनात आहे. WHO ला पत्र लिहून या कोरोनाबाबत संशोधन करण्यासाठी सांगणार आहे, असा चिमटाही नितेश राणे यांनी काढला.

हिंदूविरोधी सामना वाचायचा आम्ही बंद केला 

आता वेगळ्या प्रकारचा सामना वाचायला मिळतोय. बाळासाहेबांच्या काळात हिंदुत्वाचा गवगवा करणारा सामना आम्ही वाचलाय.उद्धव ठाकरेंचा नवीन सामना मार्केटमध्ये येतोय. हिंदूंना विरोध केला जातो. हिंदूंच्या सणांना विरोध केला जातोय. हिंदूविरोधी सामना वाचायचा आम्ही बंद केला आहे, या शब्दांत नितेश राणे यांनी सामनावर टीका केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे