शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

'अजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत; उद्धव ठाकरेही कंटाळतील'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 9:09 AM

चोरुन सत्तेवर आलेल्या महाविका आघाडीच्या सरकारने दिलेला शब्द पाळला नाही.

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील निकष आणि अटींविरोधात भाजपाकडून कोल्हापूरमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. चुकीचे निकष आणि जाचक अटी रद्द करुन सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय भाजपा शांत बसणार नसल्याचे भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, चोरुन सत्तेवर आलेल्या महाविका आघाडीच्या सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. तसेच सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही. त्यामुळे कर्जमाफीचा शेतकऱ्यांना काडीचाही फायदा होणार नाही. त्यामुळे चुकीचे निकष आणि जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्याचप्रमाणे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाच्या बैठकीत शांत दिसतात आणि उपमुख्यमंत्री अजित पवारच सगळ्या घोषणा करत आहेत. त्यामुळे नक्की मुख्यमंत्री कोण उद्धव ठाकरे की अजित पवार असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच अजित पवारांना एक दिवस उद्धव ठाकरेच कंटाळतील असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. 

शेतकऱ्यांचा आक्रोश रस्त्यावर आणण्याणासाठी आम्ही हा मोर्चा काढला आहे. सरकारला जाग येत नसल्यानेच शाहू महाराजांच्या कोल्हापूरातून आम्ही हा आवाज उठवला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच या योजनेमध्ये पीककर्जाचा उल्लेख केल्याने नियमित कर्ज भरणाऱ्या, बँका आणि पतसंस्थांचे कर्ज काढलेल्या, मायक्रो फायनान्सचे,भूविकासचे कर्ज काढलेल्या अशा कोणत्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत नाही. 2019/ 20 या वर्षातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांचाही यामध्ये समावेश नाही. म्हणूनच आम्ही सरसकट कर्जमाफीचा आग्रह धरत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपाShiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी