शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांना पदावरुन हटवू शकते का? ज्येष्ठ वकिलांनी कायदाच सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 12:37 IST

Maharashtra Political Crisis: संबंधित निर्णयात सर्वोच्च न्यायालयाचेही थोडे चुकले आहे, असे मत ज्येष्ठ विधिज्ञांनी व्यक्त केले आहे.

Maharashtra Political Crisis: शिवसेना-राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. मागील सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यशैलीवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत ताशेरे ओढले होते. आमदार अपात्रतेच्या प्रकरणाला विलंब होतोय, तुम्ही या प्रक्रियेचे वेळापत्रक द्या नाहीतर आम्हाला यासाठी २ महिन्याचा कालावधी द्यावा लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांना पदावरून हटवू शकते का, या प्रश्नावर ज्येष्ठ विधिज्ञांनी कायद्यातील तरतुदींविषयी सूचक विधान केले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले असले, तरी राहुल नार्वेकरांकडून सुनावणीचे जुनेच वेळापत्रक न्यायालयात सादर केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यायालयात झालेल्या सुनावणीनंतर मध्ये सुट्ट्यांचे दिवस आल्यामुळे त्या सबबीखाली अध्यक्ष आधीचेच वेळापत्रक सादर करून त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभिप्राय अध्यक्ष घेऊ शकतात, असे सांगितले जात आहे. त्यासोबतच, विधानसभा अध्यक्षांकडून न्यायालयाकडून लेखी आदेशही मागितला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ, कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी भाष्य केले आहे. 

सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांना पदावरुन हटवू शकते का? 

सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांना पदावरून हटवू शकते का? या प्रश्नावर उत्तर देताना उल्हास बापट म्हणाले की, ही Quasi-judicial प्रक्रिया असल्यामुळे हे ‘ट्रिब्युनल’ आहे. त्यामुळे राहुल नार्वेकरांच्या कामावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध राहू शकतात. पण फार गंभीर प्रकरण असेल तरच सर्वोच्च न्यायालय यामध्ये हस्तक्षेप करते, अन्यथा हस्तक्षेप करत नाही, असे उल्हास बापट यांनी सांगितले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला पाच महिने झाले आहेत. संबंधित निर्णयात सर्वोच्च न्यायालयाचेही थोडे चुकले आहे. त्यांनी जो निर्णय दिला होता, त्यामध्ये काही अस्पष्टता राखली होती. सत्तेचे विकेंद्रीकरण असल्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी वाजवी वेळेत निर्णय घ्यावा, असे सांगितले. पण वाजवी वेळेचे शंभर अर्थ लावता येतात. त्यांनी त्याचवेळी स्पष्ट शब्दांत सांगायला हवे होते की, तीन महिन्यांत याचा निर्णय घ्या, असे मत उल्हास बापट यांनी मांडले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षSupreme Courtसर्वोच्च न्यायालयvidhan sabhaविधानसभा