शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

ए.बी. ... धगधगते यज्ञकुंड

By admin | Updated: January 18, 2015 00:57 IST

भाई बर्धन ! नागपूरला कर्मभूमी बनवून राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविणाऱ्या सुपुत्राला आज सन्मानित केले जाणार आहे. हार,तुरे, सत्कार हे बर्धन यांना नवीन नाही व त्यांना त्याच्यात फारसा रसदेखील नाही.

भाई बर्धन ! नागपूरला कर्मभूमी बनवून राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविणाऱ्या सुपुत्राला आज सन्मानित केले जाणार आहे. हार,तुरे, सत्कार हे बर्धन यांना नवीन नाही व त्यांना त्याच्यात फारसा रसदेखील नाही. स्वातंत्र्यानंतर देशाप्रमाणेच नागपुरात अनेक राजकीय परिवर्तने झाली. वेगवेगळ्या चळवळींनी वेगवेगळे नेते घडविले. काही नेते लोकप्रियतेच्या लाटांवर आरुढ होऊन सत्तापदापर्यंत गेले तर काळाच्या ओघात अ़नेक नेते उपेक्षेच्या तळाशी गेले. परंतु या सर्व घडामोडींमध्ये उपराजधानीतील एका नेत्याची प्रतिमा ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ राहिली. त्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा, विचार आणि चळवळीची भूमिका आजही कायम आहे. असे अजातशत्रू कम्युनिस्ट नेते भाई अर्धेंदुभूषण बर्धन म्हणजेच जनतेचे लाडके ‘ए. बी.’ यांचे आयुष्य म्हणजे संघर्षाचा एक धगधगता प्रवास आहे. एक अभ्यासक नेता, निर्भय संघटक, नि:स्पृह कार्यकर्ता, कुशल राजकारणी, मार्मिक वक्ता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणते सुसंस्कृत मनुष्य ही ओळख त्यांनी आजही टिकवून ठेवली आहे. जनतेच्या मनातील आदराचे स्थान न गमाविलेल्या अगदी फार थोड्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांची राजकीय लोकप्रियता कमी जास्त झाली असेल, कधी विरोधही झाला असेल पण ८९ वर्षे वय असलेल्या ‘ए.बी.’ या व्यक्तीविषयीचा आदर आजही तसाच आहे. त्यात कुठलाही ढोंगीपणा नाही, कृत्रिमता नाही. आज होणारा सत्कार हा केवळ बर्धन यांचा सत्कार नाही, तर त्यांचे विचार, त्यांचे कर्म, त्यांचा संघर्ष, त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून झुंजलेला कामगारवर्ग या सर्वांचा सन्मान आहे.अपयशातदेखील कार्यकर्त्यांना दिला उत्साहभाई बर्धन अनेकदा निवडणुकांच्या रिंगणात उतरले आणि एक अपवाद वगळता त्यांना प्रत्येक वेळी पराभवाचा सामना करावा लागला. परंतु पराभवानंतरदेखील त्यांनी कधीच हार मानली नाही व नव्या जोमाने प्रत्येक वेळी ते कामाला लागायचे. निवडणुकीतील अपयश कसे असते हे विचारायचे झाले तर कॉम्रेड बर्धन यांनाच ते विचारावे लागेल. अपयश आले असतानादेखील माझा पक्ष कार्यकर्ता निराश होता कामा नये म्हणून संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची विचारपूस करणे हा त्यांचा स्वभावगुणच. कार्यकर्त्यांना दिलासा देताना मार्क्सवाद आणि लेनिनवादानी दिलेली शिकवण कार्यकर्त्यांसमोर ठेवून त्यांना परत कामाला लावणे हे कसब बर्धन यांच्यातच पहायला मिळते. निवडणूक झाल्यानंतर ५ वर्षे निवडून गेलेला आणि पराभूत झालेल्या उमेदवारांचे दर्शन जनतेला फारसे होत नसते. परंतु बर्धन मात्र सामान्यांच्या जवळ परत जायचे आणि सर्व काही विसरून मदतीचा हात द्यायचे. हिंमतवाला नेताकॉम्रेड बर्धन यांच्यात विचारशक्तीप्रमाणेच धाडसीवृत्तीदेखील होती. १९६९ साली नागपुरात भीषण जातीय दंगल झाली. एकीकडे तत्कालीन नेते मूग गिळून गप्प असताना बर्धन मात्र जीवाची पर्वा न करता दंगली थांबविण्याचा प्रयत्न करण्यासाठी धडपडत होते. आझाद नगर टेका परिसरात दोन गटात हाणामारी सुरू होती. दंगलीत कशाला पडायचे म्हणून कुणीही ती थांबविण्यासाठी पुढाकार घेतला नव्हता. अचानकपणे बर्धन अक्षरश: धावत तेथे आले व हातात शस्त्र अन् डोक्यात संताप असलेल्या सैतानांच्या मध्ये शिरले. हाणामारी करणाऱ्यांपैकी काही लोकांनी त्यांना ओळखले अन् ‘बर्धन साहाब आप हट जावो’ या शब्दांत त्यांना इशारा दिला. परंतु हाडाचे कार्यकर्ते असलेल्या बर्धन यांनी करारी आवाजात प्रत्युत्तर दिले अन् ‘बंद करो ये तमाशा’ असे कुणालाही न घाबरता सुनावले. बर्धन यांचा त्वेष पाहून दोन्ही गटातील लोक शांत झाले. मिल कामगारांच्या आंदोलनाचा विखारकॉम्रेड बर्धन यांनी उपराजधानीतील मिल कामगारांच्या प्रश्नांना सातत्याने उचलून धरले होते. १९६६ मध्ये मॉडेल मिलमधील कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी केलेल्या बेमुदत उपोषणाने सरकारला कापरे भरले होते. १९ एप्रिल १९८६ ला टाटांनी एका रात्रीतून १११ वर्षे जुनी असलेली गिरणी बंद पाडली. ही गिरणी महाराष्ट्र सरकारने ताब्यात घेऊन सुरू करावी, या मागणीसाठी बर्धन यांनी एकहाती लढा उभा केला. ६ जून १९८६ रोजी एम्प्रेस मिलचे ‘ताला तोडो’ आंदोलन फार गाजले. मॉडेल मिलच्या चाळींना पाडू नये व चाळीतील कामगारांचे जीवन उद्ध्वस्त होऊ नये याकरिता बर्धन यांनी कामगारांना एकत्रित केले. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना सुरक्षा व्यवस्था असतानादेखील काळे झेंडे दाखविण्यात आले. यावेळी पोलिसांनी लाठीमार केला अन् जखमी झाले असतानादेखील तत्कालीन पोलीस आयुक्तांनी बर्धन यांना अटक केली. इतकेच नव्हे तर सर्वांसमोर अपमानजनक वागणूकदेखील दिली. परंतु बर्धन यांनी संयम सोडला नाही. नागपुरात कॉम्रेड रुईकर, एम.व्ही.मेहेंद्रे, यांच्यासारख्यांसोबत बर्धन कामगार संघर्षात सतत लढत राहिले. सर्वपक्षीय मित्रत्वभाई बर्धन यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक पैलू म्हणजे सर्व पक्षातील नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. पक्षाच्या पातळीवर वैचारिक मतभेद असले तरी व्यक्तिगत संबंध टिकविण्यावर त्यांचा भर असतो. राजकीय मतभेद असतानाही जनसंघाच्या सुमतीताई सुकळीकरांपासून ते कॉंग्रेसमधील वसंत साठे यांच्यापर्यंत बर्धन यांचे कौटुंबिक संबंध होते. तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली होती. परंतु बाळासाहेबांच्या प्रामाणिक ध्येयनिष्ठेबद्दल प्रशंसोद्गार काढून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. बाळासाहेब देवरसांनी बर्धन यांच्या बुद्धिमत्तेबाबत प्रशंसोद्गार काढले होते. दत्तोपंत ठेंगडींबद्दल आदराने बोलत असताना नितीन गडकरी यांचे ते नेहमी कौतुक करायचे. हिंदू महासभेच्या एका कार्यक्रमात तर विक्रम सावरकरांना सर्वांसमोर आलिंगन दिले होते. परंतु अशा शिष्टाचारांमुळे राजकीय मैदानात विरोधकांना झुंज देण्याच्या त्यांच्या कर्मयोगात कधीही बाधा आली नाही.