शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

३ हजार कोटींच्या विहिरी

By admin | Updated: July 18, 2014 01:02 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतून (मनरेगा) एक लाख विहिरी खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक विहिरीसाठी तीन लाख रुपये खर्च होत असून या माध्यमातून एकूण तीन

मनरेगा : विदर्भात ३५ टक्के कामे
नागपूर: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतून (मनरेगा) एक लाख विहिरी खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक विहिरीसाठी तीन लाख रुपये खर्च होत असून या माध्यमातून एकूण तीन हजार कोटींची कामे होणार आहेत.
एक लाख विहिरींपैकी ३० हजार विहिरींची कामे पूर्ण झाली असून उर्वरित ७० हजार विहिरींची कामे प्रगतिपथावर आहेत, असे रोहोयो मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.
मनरेगाच्या नवीन आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य स्थापनेवेळी पुण्यातील १६ मुख्यालये नागपुरात सुरू करण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले. वन , खाण आणि इतर काही मुख्यालयांचा अपवाद सोडला तर बरीचशी कार्यालये अद्याप येथे आली नाहीत. रोहयो खात्याचा मंत्री झाल्यानंतर मनरेगाचे मुख्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव जेव्हा पुढे आला तेंव्हाही पुण्याचेच नाव होते. मात्र ते विदर्भात सुरू करण्यासाठी प्रयत्न केले व त्यात यश आले. विदर्भात सध्या मनरेगाची ३५ टक्के कामे सुरू आहेत. मुख्यालय नागपूरमध्ये सुरू करण्याचा हा फायदा आहे.
तीन वर्षापूर्वी या योजनेचे बजेट ३४० कोटी रुपये होते आता ते २ हजार कोटींवर गेले आहे. मनरेगाच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्यात जास्तीत जास्त कामे सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे. दुष्काळाच्या काळातही मागेल त्याला काम देण्याची शासनाची तयारी आहे. यावर्षासाठी १२०० कोटींच्या कामांचे उदिष्ट निश्चित करण्यात आले असून पुढच्या वर्षासाठी १५०० कोटींचे नियोजन करण्यात आले आहे. २८ हजार ग्रामपंचायतीत रोपवाटिका तयार करण्यात आल्या असून त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे, असे राऊत म्हणाले. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. उपग्रह प्रणालीवर आधारित यंत्रणा वापरण्यात येत आहे. मजुरांना लवकरात लवकर मजुरी मिळावी यासाठी नवीन यंत्रणा अस्तित्वात आणण्यात आली आहे, असे राऊत म्हणाले.
राज्यस्तरीय कार्यशाळा
दरम्यान दुपारी राज्यभरातून आलेले ग्रामरोजगार सेवक आणि इतर अधिकाऱ्यांची देशपांडे सभागृहात कार्यशाळा झाली. यात विविध योजनांची माहिती देण्यात आली. ग्राम रोजगार सेवक व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी राऊत यांनी दिले.
नरेगाची कामे विखुरलेली असल्याने ती दिसत नाही मात्र ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात या कामातून गुंतवणूक झाली आहे, असे प्रधान सचिव व्ही.गिरीराज म्हणाले. (प्रतिनिधी)
नवीन आयुक्तालय चकाचक
मनरेगा नवीन आयुक्तालयाची रचना एखाद्या कार्पोरेट कंपनीच्या कार्यालयाप्रमाणे करण्यात आली आहे. प्रशासकीय भवनाच्या (क्रं २) पहिल्या माळ्यावर असलेल्या या कार्यालयाचे उद््घाटन गुरुवारी रोहयो मंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रधान सचिव व्ही गिरीराज,कार्यशाळेला विभागीय आयुक्त अनुप कुमार, मनरेगाचे आयुक्त एम. संकरनारायणन, नासुप्रचे सभापती डॉ. प्रवीण दराडे, रोहोयोच्या उपसचिव आर. विमला यांच्यासह इतरही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यालयाच्या रचनेवर एकूण दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. सध्या विभागीय आयुक्त कार्यालयात हे आयुक्तालयाचे कामकाज सुरू होते.