शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अमर आडके यांचे प्रतिपादन : वडणगे येथे सिद्धी ग्रुपच्यावतीने व्याख्यान

By admin | Updated: January 10, 2015 00:27 IST

हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीत कोल्हापूर जिल्ह्याच्या परिसरात अनेक युद्धे लढली गेली.


वडणगे : पावनखिंडीतील संग्राम हा हिंदवी स्वराज्याच्या संघर्षातील तेजस्वी पैलू असून, इतिहासात या संग्रामाला वेगळे महत्त्व आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके यांनी केले.वडणगे (ता. करवीर) येथील सिद्धी ग्रुपच्यावतीने पार्वती मंदिर परिसरात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बीएसएनएलचे महाप्रबंधक एम. आर. रावत होते. तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, एस. डी. मुरगी प्रमुख उपस्थित होते.
डॉ. आडके म्हणाले, हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीत कोल्हापूर जिल्ह्याच्या परिसरात अनेक युद्धे लढली गेली. चिंचवाड परिसरात १६६० मध्ये शिवाजीराजांनी पहिली मैदानी लढाई करून ती जिंकली. परिसरातील अनेक किल्ले त्यांनी काबीज केले. शत्रूशी सामना करताना बचाव आणि जनतेचे कमीत कमी नुकसान व शत्रूची दमछाक करून जेरीला आणण्यासाठी पन्हाळा या गडाची त्यांनी निवड केली. हा डावपेच पूर्ण यशस्वी झाला.
पावनखिंडीच्या रणसंग्रामात अग्रक्रमाने शिवा काशीद यांचे नाव घ्यावे लागेल. आपण मृत्यूच्या गुहेत मरायला चाललो आहोत, हे माहीत असूनही स्वराज्यासाठी, स्वामींसाठी आनंदाने ते सामोरे गेले. शिवाजी महाराजांचे रूप घेऊन एक दिवसाचा शिवाजी बनण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांच्या बलिदानातून सुरू झालेला पावनखिंडीचा रणसंग्राम बाजीप्रभूंच्या हौतात्म्यापर्यंत येऊन संपतो. मात्र, पन्हाळ्यावर खरा इतिहास सांगितला जात नाही, हे आपले दुर्दैव असल्याचेही डॉ. अडके म्हणाले.
रणजित व्हरगे यांनी स्वागत केले. रणजित पाटील, संतोष पाटील, विश्वजित पाटील, सचिन केसरकर, प्रमोद पोवार, सचिन मगदूम, उमेश नांगरे, राजेंद्र जाधव, आदींनी संयोजन केले. (वार्ताहर)