शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: इचलकरंजीत विधानसभेसाठी इच्छुकांची जुळवाजुळव; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 13:21 IST

उमेदवारांना थांबवताना अडचण

अतुल आंबी

इचलकरंजी : विधानसभेसाठी उमेदवार निश्चित झाले नसले तरी आरोप-प्रत्यारोप मात्र सुरू झाले आहे. इचलकरंजी शहरातील विकासकामांसह पाणी योजनेभोवती राजकारण फिरत आहे; परंतु ऐन निवडणुकीवेळी कोणता मुद्दा चर्चेला येतो आणि त्यावेळी जो जोर लावतो, तोच बाजी मारतो, असे काहीसे समीकरण या मतदारसंघात दिसत आहे. त्यामुळे राजकीय व्यक्ती एकमेकांना घेरण्यासाठी सरसावले आहेत.

गत निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे यांनी ऐनवेळी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दहा वर्षे आमदार असलेल्या सुरेश हाळवणकर यांना वस्त्रोद्योग आणि पाणी या मुद्द्यांवर घेरले तसेच निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा देणार असल्याची वातावरणनिर्मिती केली. त्याचे फलित म्हणून आवाडे विजयी झाले.

गत लोकसभा निवडणुकीतही असाच प्रकार घडला. बघता बघता धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळाली आणि शहराचा पाणीप्रश्न आणि वस्त्रोद्योग याच मुद्द्यांवर घेरून माजी खासदार राजू शेट्टी यांना पराभूत करण्यात आले. तोच धागा पकडत या लोकसभा निवडणुकीत पुन्हा पाणीप्रश्न गाजविण्याचा प्रयत्न झाला. परंतु तिरंगी लढत आणि हिंदुत्ववादी मतांचा प्रभाव यातून पुन्हा माने यांनी बाजी मारली.

यावेळी आमदार आवाडे यांनी पुत्र राहुल यांना उमेदवार घोषित केले आहे. त्यादृष्टीने त्यांची महायुतीच्या वरिष्ठ स्तरावर उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डिंग सुरू आहे. उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष लढण्याची तयारी आहे. त्यासाठी आवश्यक रान उठविण्याचा कार्यक्रम आमदार आवाडे यांनी सुरू केला आहे. कोणत्याही विषयाचा कार्यक्रम असो, आमदार आवाडे यांचे भाषण राजकीय विषयाला धरून चर्चेत राहील, असेच असते. पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच काँग्रेसकडून उमेदवारी मागितलेले संजय कांबळे यांच्यानंतर त्यांनी नाव न घेता हाळवणकरांवरही आगपाखड केली आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनीही त्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विठ्ठल चोपडे यांनी, आवाडे यांच्याकडून स्वत:चे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यायावर आरोप करण्याचा प्रकार सुरू असल्याचे पत्रक काढले तसेच सागर चाळके यांनी, शहरातील पाच वर्षांत केलेले ठळक विकासकाम सांगा अथवा चौकात एका मंचावर सभा लावा, असे आव्हान दिले. तर कांबळे यांनी आवाडे खोटे बोलतात व दिशाभूल करतात, असा आरोप केला. त्यानंतरही आवाडे यांनी एका वार्षिक सभेत हाळवणकर यांना घेरत गावाशी देणं-घेणं नसलेल्या, नियोजन नसलेले व्यक्ती गावचे लोकप्रतिनिधी झाले. त्यामुळे विकास खुंटला, असा आरोप नाव न घेता केला.

उमेदवारांना थांबवताना अडचण

महाविकास आघाडी एकसंध असल्याचे सांगत असले तरी सर्व घटक पक्षांतील इच्छुक उमेदवार मात्र जोरदार तयारीला लागले आहेत. सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर एका उमेदवाराचे नाव निश्चित झाल्यास तयारी पूर्ण झालेल्या अन्य उमेदवारांना थांबविताना अडचण होणार आहे. त्यामुळे वेळीच निर्णय होणे आवश्यक आहे.

बारा आमदारांची नियुक्ती पुढे गेली

विधानपरिषदेवर नियुक्त केल्या जाणाऱ्या बारा आमदारांमध्ये सुरेश हाळवणकर यांचे नाव घेतले जाईल आणि इचलकरंजीत महायुतीकडून आवाडे यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सुरू होती. परंतु बाराजणांच्या नियुक्तीचा कार्यक्रम ऑक्टोबरपर्यंत पुढे गेल्याने पुन्हा पेच निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी कस लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाPrakash Awadeप्रकाश आवाडेSuresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकर