शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आंबेओहोळ प्रकल्पाचा जलपूजनाचा कार्यक्रम होणार लोकोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:28 IST

रवींद्र येसादे उत्तूर : १६ ऑक्टोबर १९९८ रोजी प्रशासकीय मंजुरी मिळालेला आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्प २२ वर्षांनंतर पूर्णत्वास आला ...

रवींद्र येसादे

उत्तूर : १६ ऑक्टोबर १९९८ रोजी प्रशासकीय मंजुरी मिळालेला आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्प २२ वर्षांनंतर पूर्णत्वास आला आहे. लोकोत्सव ठरणाऱ्या या प्रकल्पाचा जलपूजन आज (गुरुवारी) होत आहे. यानिमित्त आंबेओहोळ प्रकल्पामुळे ३९२५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सव्वा टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असणाऱ्या प्रकल्पात सध्या प्रकल्पात ८८ टक्के इतका पाणीसाठा आहे. प्रकल्प तुडुंब भरल्याने उत्तूर परिसरासह गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव, गिजवणे, शिप्पूर, लिंगनूर या परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

कृती समितींची मतभिन्नता प्रशासकीय अडचणी, न्यायालयीन दाव्यांचा अडथळा, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासाठी होणारी आंदोलने, निधीसाठी नसणारी तरतूद अशा अनेक कारणांनी हा प्रकल्प रखडला.

तत्कालीन आमदार बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नाने प्रकल्पाला मंजुरी मिळाली. परंतु, त्यांचे निधन आणि मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आली.

बहुतांश प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सुटल्या, काही अंशी शिल्लक असणारे पुनर्वसन केल्याशिवाय आपण मागे हटणार नाही. त्यांनी दिल्याने गेली दोन वर्षे प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली अन् प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे गेले.

प्रकल्पाचे ३३.८४ चौ. कि. मी. इतके पाणलोट क्षेत्र आहे. ३५.११ द.ल.घ.मी. एकूण पाणीसाठा असणार आहे. उपयुक्त पाणीसाठा ३३.६३ द.ल.घ.मी. असणार आहे. आजरा तालुक्यातील १० तर गडहिंग्लज तालुक्यातील ११ गावांना पाण्याचा लाभ होणार आहे. १९६० मीटर मातीचे धरण व ८० मीटर सांडवा आहे. ०.५० मेगावॅट क्षमतेची विद्युतनिर्मिती होणार आहे. बांधकामावर ८४.८७ कोटी, भू-संपादन व पुनर्वसनासाठी ९९.७३ कोटी असा खर्च झाला आहे.

कोल्हापूर पद्धतीचे ७ बंधारे असून ६ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. १४१ प्रकल्पग्रस्तांना कडगाव व लिंगनूर येथे भूखंड वाटप होणार आहेत. भू-संपादनासाठी ३४९.५० हेक्टर खासगी जमीन आवश्यक आहे. संबंधित क्षेत्र संपादनासाठी अंतिम निवाड्यानुसार मोबदला वाटप होऊन संपूर्ण ३७९.५० हेक्टर क्षेत्र जलसंपदाच्या ताब्यात आहे. एकूण ८१७ प्रकल्पग्रस्त असून ३५७ प्रकल्पग्रस्तांनी स्वेच्छा पुनर्वसन स्वीकारले आहे. ४६० प्रकल्पग्रस्त पुनर्वसनासाठी पात्र आहेत. पूर्णत: जमीन वाटप झालेले ९३, अंशत: जमीन वाटप झालेले ३०, अंशत: पॅकेज वाटप करून पुनर्वसन झालेले ३६, आर्थिक पॅकेज वाटप करून पूर्णत: पुनर्वसन झालेले प्रकल्पग्रस्त २४६, पूर्णत: पुनर्वसन झालेले प्रकल्पग्रस्त ३७५, अशंत: पुनर्वसन पूर्ण झालेले पुनर्वसन प्रकल्पग्रस्त ३०, पूर्णत: पुनर्वसन न झालेले प्रकल्पग्रस्त ५५, पॅकेज प्रगतीत असणारे १२, पुनर्वसनास प्रतिसाद न दिलेले २८ जण आहेत. या प्रकल्पामुळे उत्तूर २२, आर्दाळ १३६, करपेवाडी १५, होन्याळी ८५, हालेवाडी ९३, महागोंड १९, वडकशिवाले १७ आदी शेतकऱ्यांच्या जमिनी बुडित क्षेत्रात गेल्या आहेत. तर आर्दाळ २५२, करपेवाडी १५३, उत्तूर ५१, हालेवाडी १७२, होन्याळी १६५, महागोंड ३०, वडकशिवाले ४५ इतके प्रकल्पग्रस्त बाधित झाले आहेत.