शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने वाढीव भरपाई दिली नाही तर बळिराजाशी गाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क / खोची : महापुराने जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या बाबतीत सरकारने एकटे पाडले आहे. जनमताच्या दबावाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क / खोची : महापुराने जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या बाबतीत सरकारने एकटे पाडले आहे. जनमताच्या दबावाने सरकार निर्णय बदलते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन ताकद दाखवावी. सरकारने वाढीव भरीव नुकसान भरपाई दिली नाही तर गाठ बळिराजाशी आहे, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला.

पूरग्रस्तांच्या न्याय्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या पूरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चाच्या नियोजनासाठी खोची येथे वारणाकाठच्या १७ गावांतील शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वडगाव बाजार समितीचे संचालक एम. के. चव्हाण होते.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, प्रतिगुंठा उसाला १३५, इतर खरीब पिकांना ६८ रुपयांची नुकसान भरपाई ही अत्यंत तोकडी आहे. खराब झालेल्या पिकाच्या शेतीची स्वच्छता करण्यासाठी याच्या दुप्पट खर्च येणार आहे. नुकसान भरपाईसंदर्भातील निर्णय नाही बदलला तर महागात पडेल. शेतकऱ्यांनी हातातील काम सोडून २३ तारखेच्या मोर्चात सहभागी होऊन आपली संघटित शक्ती दाखवावी.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, सरचिटणीस शिवाजी पाटील, सरपंच जगदीश पाटील, संदीप कारंडे, अप्पासाहेब एडके, प्रकाश पाटील, रामचंद्र मगदूम, अमरसिंह पाटील, सुरेश शिर्के, सुनील देसाई, संपतराव पवार, अण्णासो मगदूम, बाबूराव बाबर, राजकुमार मगदूम, दिनकर घाडगे, दादासो पाटील, अक्षय देसाई, महावीर चौगुले, आदी उपस्थित होते.

चौकट- १) भाजपने सोयाबीनचे दर कमी केले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केलेले नाही. त्यांच्याबरोबर मी जाण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील सत्ताधारी यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाहीत तर त्यांच्या छाताडावर बसून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ. मी शेतकऱ्यांचा आहे. त्यांच्यासोबतच कायम राहणार आहे, असे शेट्टी म्हणाले.

फोटो ओळी-

खोची येथे वारणाकाठच्या शेतकऱ्यांच्या बैठकीत माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संदीप कारंडे, जगदीश पाटील, शिवाजी पाटील, रामचंद्र मगदूम, वैभव कांबळे उपस्थित होते. (छाया-आयुब मुल्ला)

१७ खोची राजू शेट्टी