शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Hatkanangle Lok Sabha Election : 'स्वाभिमानीच्या नावाखाली लाचारी पत्करतात'; धैर्यशील मानेंचा राजू शेट्टींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 12:41 IST

Hatkanangle Lok Sabha Election : हातकणंगले लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता बळावली आहे. त्यासाठी त्यांच्यावर कार्यकर्त्यांकडून मोठा दबाव आहे.

Hatkanangle Lok Sabha Election : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याविरोधात शिंदे गटाचे धैर्यशील माने अशी लढत होणार असल्याचे दिसत आहे. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता वेगळा पावित्रा घेतल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीने या मतदारसंघात अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही. दरम्यान, आज महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

हातकणंगले लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता बळावली आहे. त्यासाठी त्यांच्यावर कार्यकर्त्यांकडून मोठा दबाव आहे. मात्र, याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. काही दिवसातच या निर्णय होऊ शकतो असं बोललं जात आहे. दरम्यान, आता यावरुन खासदार धैर्यशील माने यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका केली आहे. 

उद्धव ठाकरे भाजपला तगडा झटका देणार; नाराज खासदार राऊतांच्या भेटीला

"यांना जर स्वाभिमान असेल तर त्यांना लाचारी पत्करायची नसेल तर कुणाशी चर्चा करायचे कारण नाही. त्यांचा मार्ग त्यांनी निवडलेला आहे, पहिल्या दिवसापासून ते डायलॉग मारत आहेत. पण, दुसऱ्या बाजूला इलेक्शनच्या गणितासाठी म्हणून हे वैचारिक गणित नाही. ते साखर कारखानदारांसोबत युती करतात तेव्हा ती कोणती आयडॉलॉजी युती करतात.त्यामुळे ते आयडॉलॉजीकल युतीमध्ये पडत नाहीत, इलेक्ट्रोरियल युतीकडे लक्ष देतात, मी कसा निवडून येईल. एवढाच त्यांचा निव्वळ प्रयत्न सुरू आहे, असा आरोप खासदार धैर्यशील माने यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केला. 

"पार्टीचं नाव स्वाभिमानी ठेऊन स्वाभिमानी होता येत नाही"

"महाराष्ट्रात ते स्वाभिमानी नावाची जी संघटना चालत आहेत, त्यामध्ये किती खासदार, आमदार किती जिल्हा परिषदमध्ये सदस्यांना बळ देत आहेत. ते निव्वळ आपल्या पुरत सेल्फ सेंट्रीक राजकारण करत आहेत.ते फक्त स्वाभिमानीच्या नावाखाली लाचारी पत्करण्याचे काम करत आहेत. आता कामाची सुरुवात झाली आहे, त्यांच्या पार्टीचं काय करावं हा त्यांचा निर्णय आहे. एखाद्या पार्टीचं नाव फक्त स्वाभिमानी ठेऊन काही स्वाभिमानी होता येत नाही त्याला स्वाभिमानानं वागावं लागतं, त्यांनी दरवेळी नवीन गोष्टी केल्या आहेत. त्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत हे प्रत्येकवळी इथल्या जनतेने पाहिलं आहे, असंही माने म्हणाले. 

टॅग्स :dhairyasheel maneधैर्यशील मानेRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर