शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
6
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
7
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
8
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
9
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
11
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
12
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
13
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
14
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
15
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
16
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
17
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
18
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
19
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
20
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजी ‘ट्रेनिंग’ दौऱ्यावर... पोरं वाऱ्यावर...

By admin | Updated: January 14, 2015 00:36 IST

करवीरमधील शाळांची अवस्था : शिक्षक प्रशिक्षणात असल्याने एक किंवा दोन शिक्षकांवर शाळा चालतात

प्रकाश पाटील -कोपार्डे - करवीर तालुक्यातील प्राथमिक शाळांतील शिक्षक सध्या विविध प्रशिक्षणांतर्गत गुंतले असून, शिक्षक प्रशिक्षणात, तर विद्यार्थी वाऱ्यावर असे चित्र निर्माण झाले आहे. या प्रशिक्षणास मुख्याध्यापकांच्या तोंडी आदेशाने जावे लागत असल्याने प्रत्येक गावातील शाळेत एक किंवा दोन शिक्षकांवर पाच किंवा सात तुकड्यांचा भार पडला असल्याने शिक्षणाचा बट्याबोळ सुरू असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे.
करवीर तालुक्यातील शिक्षण विभागाच्यावतीने पहिली ते सातवीसाठीच्या प्राथमिक शिक्षकांना विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याबाबत करवीर तालुका शिक्षण विभागामार्फत केंद्र शाळांना, केंद्र शाळाकडून मुख्याध्यापकांना व मुख्याध्यापकांकडून प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग नोंदविण्यासाठी शिक्षकांना तोंडी आदेश दिले जात आहेत.
यात पहिली ते पाचवीसाठी वाचन-लेखन प्रशिक्षण, तर सातवीपर्यंतच्या शिक्षकांसाठी विषयानुसार यामध्ये गणित, विज्ञान, इंग्रजी विषयांचे प्रशिक्षण सुरू आहे. गेले पंधरा दिवस पहिली ते सातवीच्या शाळेतील चार शिक्षक या प्रशिक्षणासाठी पाठविले जात आहेत. मात्र, यामुळे या शाळांतून गेले १५ दिवस झाले केवळ दोनच शिक्षकांवर सर्व तुकड्यांच्या शिक्षणाचे काम
सुरू आहे. याचा परिणाम शाळांत उपस्थिती असणारे शिक्षक धड कोणत्याच वर्गात शिक्षण देऊ
शकत नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून या प्रशिक्षणामुळे वंचित होत आहेत.
प्रत्येक शिक्षकाला वाचन- लेखनासाठी चार दिवस, तर विषय शिक्षकांना एक आठवड्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, पहिला शिक्षकांचा संच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता शाळेत कार्यरत असणारे शिक्षक पुन्हा प्रशिक्षणाला जाणार आहेत. यामध्ये किमान १५ दिवस ते एक महिना जाणार आहे. या प्रशिक्षित शिक्षकांतून पुन्हा ‘मास्टर ट्रेनर’ शिक्षक निवडला जाणार आहे. या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने यामुळे पालकांत संताप व्यक्त होत आहे.


इतर कामांचा बोजा
मुख्याध्यापकांना सध्या मध्यान्ह भोजनाची माहिती आॅनलाईन द्यावी लागत असल्याने येणाऱ्या धान्याचा पुरवठा व खर्च यांचा मेळ घालण्यातच त्यांचा वेळ जात असल्याने शैक्षणिक काम कमी व इतर कामाचा बोजा जास्त अशी अवस्था मुख्याध्यापकांची आहे.
यातच बी. एड्.चे प्रशिक्षण घेणाऱ्यांनाही रजा मंजूर करण्यात येत असल्याने शैक्षणिक कामकाजाचा बट्ट्याबोळ होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.


सुटीत प्रशिक्षणाची गरज
मे महिन्याच्या सुटीत प्रशिक्षण कार्यक्रम राबविला गेला तर शिक्षकांना अगदी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन करता येणार आहे.
पण शैक्षणिक वर्षाच्या मध्यावधीमध्येच प्रशिक्षणाचा घाट शिक्षण विभागाने घातल्याने प्रशिक्षणासाठी गेलेले शिक्षक व एखाद्या शिक्षकाने रजा घेतल्यास केवळ एका शिक्षकावर चार किंवा सहा ते सात वर्ग चालविण्याची वेळ येत आहे.

परीक्षा तोंडावर
स्कॉलरशिप व पूर्वपरीक्षा तोंडावर असताना शिक्षण विभागाने केवळ प्रशिक्षणावर आलेला निधी खर्च करण्यासाठी हा खटाटोप सुरू केल्याची चर्चा शिक्षकांतून व्यक्त होत आहे.
केवळ तीन महिन्यांनी हे शैक्षणिक वर्ष संपणार असल्याने आता या
प्रशिक्षणातून शिक्षकांना मिळणारे ज्ञान विद्यार्थ्यांना किती देणार व त्याचा फायदा होणार काय याबद्दलही शंका व्यक्त करण्यात येत आहे.