शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहरात अनेक घरातून पूराचे पाणी; अडकलेल्या नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 15:11 IST

पंचगंगा नदीला पूर आल्यामुळे जयंती नाल्यातील पाणीच्या प्रवाह थांबला आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या तुफान पावसामुळे रामानंदनगर, सुतारवाडा, शाहूपुरी कुंभारगल्ली, मुक्त सैनिक वसाहत येथील अनेक घरात पुराचे पाणी शिरल्याने शहरवासियांची एकच तारांबळ उडाली. महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांसह अग्निशमन दलांनी तात्काळ धाव घेऊन घरात अडकलेल्या नागरीकांना सुरक्षीत ठिकाणी हलविले.

पंचगंगा नदीला पूर आल्यामुळे जयंती नाल्यातील पाणीच्या प्रवाह थांबला आहे. त्यातच रात्रभर कोसळणाऱ्या तुफान पावसाने कळंबा तलवा काठोकाठ भरला आणि त्यातील पाणी सांडव्यावरुन वेगाने बाहेर पडले. त्यामुळे रामानंदनगर पुलावर पाणी आले. तसेच रामानंद नगरातील शंभरहून अधिक घरात पाणी शिरले. पहाटेच्या वेळी अचानक पाण्याची पातळी वाढल्याने घरातील नागरीकांनी पहिल्या माळ्यावर धाव घेतली.

अग्निशमन दलाची पथके तेथे पोहचली, त्यांनी नागरीकांना घरातून बाहेर पडण्याचे आवाहन केले. पण नागरीकांनी घरातून बाहेर पडण्यास नकार दिला. दरम्यान त्याठिकाणी आमदार ऋतुराज पाटील, माजी नगरसेवक मधुकर रामाणे पोहचले. त्यांनी अग्निशमन दलाची बोट घेऊन जाऊन नागरीकांना बाहेर पडण्याची विनंती केली. पाण्याची पातळी आणखी वाढण्याअगोदर बाहेर पडा अशी विनंती करताच नागरीकांनी बाहेर पडण्यास सहमती दिली. जवळपास पन्नास घरातील नागरीकांना बोटीतून बाहेर काढण्यात आले.

शहरातील शाहुपूरी कुंभार गल्ली, सहावी गल्ली परिसरातील बऱ्याच घरातून पाणी शिरले. नागरीकांनी स्वत:हून घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काही कुटुंबांनी केलेल्या गणेश मूर्ती सुध्दा सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली. पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे सहाव्या गल्लीतील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली. सुतारवाडा नागरी वस्तीत पाणी शिरले. तेथील सर्वच कुटुंबांना नजिकच्या चित्रदूर्ग मठात स्थलांतर करण्यात आले. मुक्त सैनिक वसाहत परिसरातही अनेक घरांच्या उंबऱ्यांपर्यं पाणी पोहचले आहे. रस्ते पाण्यात बुडाले आहेत. त्याठिकाणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली.

शहरावर पुराचे संकट ओढवल्यामुळे महापालिका यंत्रणा सक्रिय झाली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, उप मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, सहायक अधिकारी मनिष रणभिसे यांनी तात्काळ पूराचे पाणी शिरलेल्या नागरी वस्तींना भेटी दिल्या आणि नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरु केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस