शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

उद्ध्वस्त पीक.... हतबल शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:25 IST

शशिकांत भोसले लोकमत न्यूज नेटवर्क सेनापती कापशी : सोमवारी सायंकाळी चिकोत्रा खोऱ्यातील नंद्याळ, अर्जुनवाडा, करड्याळ, मुगळी, जैन्याळ (ता. कागल) ...

शशिकांत भोसले

लोकमत न्यूज नेटवर्क

सेनापती कापशी : सोमवारी सायंकाळी चिकोत्रा खोऱ्यातील नंद्याळ, अर्जुनवाडा, करड्याळ, मुगळी, जैन्याळ (ता. कागल) आदी गावांंना वळवाच्या पावसासह जोरदार बर्फवृष्टीने झोडपून काढले. यामुळे शेतातील सर्व पीक उद्ध्वस्त झाले असून शेतकरी हतबल झाला आहे. वळीव पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडेच मोडून पडले आहे. या पार्श्वभूमीवर आज कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या तज्ज्ञ समितीने या भागात दौरा करून नुकसानीची पाहणी केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. उद्योग व्यवसाय बंद पडत असल्याने कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी या परिसरातील तरुण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कलिंगड, काकडी, बावची, वांगी , दोडका, मिरची, मका, ज्वारीचे प्लांट केले. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, पण वळीव पावसाचा तडाखा सोबत जोरदार बर्फवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले भाजीपाला व कलिंगड, काकडी, ऊसपीकासह शेतातील संपूर्ण पीकच जमिनदोस्त झाले आहे. गारपिटीने ऊसाच्या पालाच्या अक्षरशः चिंध्या- चिंध्या झाल्या असून झाडांची अवस्थाही दयनीय झाली आहे. संपूर्ण पाला झडून गेला आहे. झाडांचे आंबे तर मातीत कुजून गेले आहेत.

अर्जुनवाडा

गारपिटीने अर्जुनवाडा, नंद्याळ, करड्याळ, मुगळी, जैन्याळ गावातील भाजीपाला व इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. आर्थिक दृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. या गावातील शेतकऱ्यांना तातडीने विशेष पॅकेज देऊन नुकसान भरपाई द्यावी. तत्काळ पंचनामे सुरू करावेत. नुकसानीचा आकडा मोठा असल्याने शेतकरी आता शासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसला आहे.

कोट...

नंद्याळ येथे कोरोनामुळे मोठे संकट उभारले असतानाही या परिसरातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरली. पण सोमवारी झालेल्या गारपिटीने या सगळ्यावर पाणी फेरले आहे.. हातातोंडाशी आलेले सर्व पीक जमिनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक बोजा सहन करावा लागला आहे. शेतकरी हतबल झाला असून यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी.

सागर पाटील, प्रगतशील शेतकरी ,

नुकसानीची पाहणी करून शासनाला अहवाल देणार

मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आज कृषी विद्यापीठमधील तज्ज्ञ व कृषी विभागाचे अधिकारी मिळून या परिसरात झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहणी केली. तत्काळ काय उपाययोजना करता येतील याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तज्ज्ञ समितीकडून याबाबत शासनाकडे अहवाल देण्यात येईल. शासनाचे पुढील आदेश आल्यानंतरच पंचनामे करण्यात येतील,असे तालुका कृषी अधिकारी ए. डी. भिंगारदिवे यांनी सांगितले.

फोटो:- नंद्याळ, अर्जुनवाडा, करड्याळ, मुगळी, जैन्याळ (ता. कागल) आदी गावात जोरदार वळीव व बर्फवृष्टी झाल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करताना उपविभागीय कृषी अधिकारी आर.जी.पाठक, तालुका कृषी अधिकारी ए. डी .भिंगारदिवे, मंडल कृषी अधिकारी ए. ए. माने, कृषी सहाय्यक सुनील बुगडे, कृषी सहाय्यक संदीप कांबळे, तलाठी पी. ए. कांबळे, कृषी मित्र दिलीप पाटील