शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

'छोट्या कारची मोठी गोष्ट', राज ठाकरेंनी सांगितलेली गरीबांची 'मीरा' कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 16:32 IST

‘सामान्य माणसाची कार’ म्हणून आपल्या सगळ्यांनाच रतन टाटांची "नॅनो" माहितंय,

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी इचलकंरजी येथील आपल्या भाषणात टाटाच्या नॅनो कारचा उल्लेख केला होता. तसेच, इंचलकरंजी येथील भाषणात मराठी माणसाची हुशारी आणि मराठी माणसाचे कर्तृत्व सांगतिले होते. रतन टाटांनी सर्वसामान्यांसाठी नॅनो कार बनवली. पण, त्यापूर्वीही इचलकरंजीतील मराठी माणसाने नॅनोसारख्या सर्वसामान्यांना परवडेल अशा कारची निर्मित्ती केल्याचे राज यांनी सांगतिले होते.  

‘सामान्य माणसाची कार’ म्हणून आपल्या सगळ्यांनाच रतन टाटांची "नॅनो" माहितंय, पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना ही गोष्ट माहित असेल की, अशा प्रकारचा प्रयोग देशात साधारणतः 50 वर्षापूर्वीच झाला होता. अगदी नॅनोपेक्षाही छोटी आणि नॅनोमध्ये असणारे जवळपास बरेचसे फीचर्स असणारी कार 1975 साली मुंबईच्या रस्त्यावर धावली होती. 

‘मीरा’ कार या नावाने ही कार ओळखली जात असे आणि ती कार एका मराठी माणसानेच बनवली होती. शंकरराव कुलकर्णी असे त्यांचे नाव होते. विशेष म्हणजे शंकररावांचं शिक्षण फक्त सातवीपर्यंत झालेलं, इचलकरंजीच्या एका सातवी पास महाराष्ट्रीयन माणसाने देशाला, इतिहासातील सर्वात छोटी आणि सामान्य माणसाच्या बजेटमधली कार दिली होती. या कारची किंमत 12,000 रुपये होती. सिंगल वायपर, रिअर इंजिन, ५ सीटर, २० किमी प्रतिलिटर मायलेज ही या कारची काही महत्वाची फीचर्स होत. विशेष म्हणजे या कारचे बहुतेक महत्वाचे पार्टस देसी होते. कारचं इंजिनही भारतीय बनावटीचं होते. त्या काळात शंकरराव चव्हाण, शंतनुराव किर्लोस्कर, मोहन धारिया, राजारामबापू पाटील यांसारख्या अनेक प्रतिष्ठितांनी या कारमधून प्रवास केला होता. किर्लोस्करमध्ये काम करणाऱ्या शंकररावांनी आपल्या 15 जणांच्या टीमसोबत 1945 मध्ये कार बनवण्याच्या आपल्या कल्पनेवर काम सुरु केले.

सन 1949 मध्ये शंकररावांनी या कारचे पहिले मॉडेल तयार केले. त्यात ड्रायव्हरच्या पाठीमागच्या सीटवर दोन माणसे बसू शकत असत. पुढच्या दोन दशकांच्या काळात या मॉडेलमध्ये अनेक सुधारणा करून अद्ययावत असे अजून 5 मॉडेल त्यांनी बनवले होते. शंकररावांनी जी पहिली कार बनवली होती, तीचा आरटीओ मधला नोंदणी क्रमांक एम.एच.के.1906. असा होता. इचलकरंजीच्या रस्त्यावर ही कार शंकरराव केव्हापासूनच चालवत होते, पण व्यावसायिक पातळीवर या कारच्या निर्मितीत उतरण्यासाठी सर्वप्रथम मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे ही कार प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. त्यावेळी खंडाळा घाटातून प्रवास करत शंकररावांनी ती मुंबईत आणली होती. 1975 साली जयसिंगपूर नगरपालिकेने या कारच्या निर्मितीसाठी शंकररावांना प्लांट स्थापन करण्यासाठी जागाही उपलब्ध करून दिली होती. पण, लालफितीतला कारभार आणि नोकरशाहीचा ढिम्म प्रतिसाद यांमुळे या प्रकल्पाचे पुढे काहीच होऊ शकले नाही. मीरा कारचे मॉडेल मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात येण्यासाठी सरकारी मदतीची आवश्यकता होती. तसेच अनेक शासकीय परवानग्याही गरजेच्या होत्या. त्या मिळविण्यात शंकररावांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. याशिवाय त्याचकाळात सुझुकीसुद्धा या क्षेत्रात भारतात प्लांट सुरू करण्याच्या तयारीत असल्याने शंकररावांना सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे हा प्रकल्प तिथेच रखडला. तर, शंकररावांना अनेक आर्थिक अडचणींनाही सामोरे जावे लागले होते. 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेkolhapurकोल्हापूरmarathiमराठी