शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

'छोट्या कारची मोठी गोष्ट', राज ठाकरेंनी सांगितलेली गरीबांची 'मीरा' कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 16:32 IST

‘सामान्य माणसाची कार’ म्हणून आपल्या सगळ्यांनाच रतन टाटांची "नॅनो" माहितंय,

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी इचलकंरजी येथील आपल्या भाषणात टाटाच्या नॅनो कारचा उल्लेख केला होता. तसेच, इंचलकरंजी येथील भाषणात मराठी माणसाची हुशारी आणि मराठी माणसाचे कर्तृत्व सांगतिले होते. रतन टाटांनी सर्वसामान्यांसाठी नॅनो कार बनवली. पण, त्यापूर्वीही इचलकरंजीतील मराठी माणसाने नॅनोसारख्या सर्वसामान्यांना परवडेल अशा कारची निर्मित्ती केल्याचे राज यांनी सांगतिले होते.  

‘सामान्य माणसाची कार’ म्हणून आपल्या सगळ्यांनाच रतन टाटांची "नॅनो" माहितंय, पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना ही गोष्ट माहित असेल की, अशा प्रकारचा प्रयोग देशात साधारणतः 50 वर्षापूर्वीच झाला होता. अगदी नॅनोपेक्षाही छोटी आणि नॅनोमध्ये असणारे जवळपास बरेचसे फीचर्स असणारी कार 1975 साली मुंबईच्या रस्त्यावर धावली होती. 

‘मीरा’ कार या नावाने ही कार ओळखली जात असे आणि ती कार एका मराठी माणसानेच बनवली होती. शंकरराव कुलकर्णी असे त्यांचे नाव होते. विशेष म्हणजे शंकररावांचं शिक्षण फक्त सातवीपर्यंत झालेलं, इचलकरंजीच्या एका सातवी पास महाराष्ट्रीयन माणसाने देशाला, इतिहासातील सर्वात छोटी आणि सामान्य माणसाच्या बजेटमधली कार दिली होती. या कारची किंमत 12,000 रुपये होती. सिंगल वायपर, रिअर इंजिन, ५ सीटर, २० किमी प्रतिलिटर मायलेज ही या कारची काही महत्वाची फीचर्स होत. विशेष म्हणजे या कारचे बहुतेक महत्वाचे पार्टस देसी होते. कारचं इंजिनही भारतीय बनावटीचं होते. त्या काळात शंकरराव चव्हाण, शंतनुराव किर्लोस्कर, मोहन धारिया, राजारामबापू पाटील यांसारख्या अनेक प्रतिष्ठितांनी या कारमधून प्रवास केला होता. किर्लोस्करमध्ये काम करणाऱ्या शंकररावांनी आपल्या 15 जणांच्या टीमसोबत 1945 मध्ये कार बनवण्याच्या आपल्या कल्पनेवर काम सुरु केले.

सन 1949 मध्ये शंकररावांनी या कारचे पहिले मॉडेल तयार केले. त्यात ड्रायव्हरच्या पाठीमागच्या सीटवर दोन माणसे बसू शकत असत. पुढच्या दोन दशकांच्या काळात या मॉडेलमध्ये अनेक सुधारणा करून अद्ययावत असे अजून 5 मॉडेल त्यांनी बनवले होते. शंकररावांनी जी पहिली कार बनवली होती, तीचा आरटीओ मधला नोंदणी क्रमांक एम.एच.के.1906. असा होता. इचलकरंजीच्या रस्त्यावर ही कार शंकरराव केव्हापासूनच चालवत होते, पण व्यावसायिक पातळीवर या कारच्या निर्मितीत उतरण्यासाठी सर्वप्रथम मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे ही कार प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. त्यावेळी खंडाळा घाटातून प्रवास करत शंकररावांनी ती मुंबईत आणली होती. 1975 साली जयसिंगपूर नगरपालिकेने या कारच्या निर्मितीसाठी शंकररावांना प्लांट स्थापन करण्यासाठी जागाही उपलब्ध करून दिली होती. पण, लालफितीतला कारभार आणि नोकरशाहीचा ढिम्म प्रतिसाद यांमुळे या प्रकल्पाचे पुढे काहीच होऊ शकले नाही. मीरा कारचे मॉडेल मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात येण्यासाठी सरकारी मदतीची आवश्यकता होती. तसेच अनेक शासकीय परवानग्याही गरजेच्या होत्या. त्या मिळविण्यात शंकररावांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. याशिवाय त्याचकाळात सुझुकीसुद्धा या क्षेत्रात भारतात प्लांट सुरू करण्याच्या तयारीत असल्याने शंकररावांना सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे हा प्रकल्प तिथेच रखडला. तर, शंकररावांना अनेक आर्थिक अडचणींनाही सामोरे जावे लागले होते. 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेkolhapurकोल्हापूरmarathiमराठी