शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
3
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
4
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
5
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
6
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
7
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
8
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
9
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
10
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
11
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
12
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
13
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
14
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
15
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
16
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
17
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
18
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
19
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
20
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'छोट्या कारची मोठी गोष्ट', राज ठाकरेंनी सांगितलेली गरीबांची 'मीरा' कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 16:32 IST

‘सामान्य माणसाची कार’ म्हणून आपल्या सगळ्यांनाच रतन टाटांची "नॅनो" माहितंय,

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी इचलकंरजी येथील आपल्या भाषणात टाटाच्या नॅनो कारचा उल्लेख केला होता. तसेच, इंचलकरंजी येथील भाषणात मराठी माणसाची हुशारी आणि मराठी माणसाचे कर्तृत्व सांगतिले होते. रतन टाटांनी सर्वसामान्यांसाठी नॅनो कार बनवली. पण, त्यापूर्वीही इचलकरंजीतील मराठी माणसाने नॅनोसारख्या सर्वसामान्यांना परवडेल अशा कारची निर्मित्ती केल्याचे राज यांनी सांगतिले होते.  

‘सामान्य माणसाची कार’ म्हणून आपल्या सगळ्यांनाच रतन टाटांची "नॅनो" माहितंय, पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना ही गोष्ट माहित असेल की, अशा प्रकारचा प्रयोग देशात साधारणतः 50 वर्षापूर्वीच झाला होता. अगदी नॅनोपेक्षाही छोटी आणि नॅनोमध्ये असणारे जवळपास बरेचसे फीचर्स असणारी कार 1975 साली मुंबईच्या रस्त्यावर धावली होती. 

‘मीरा’ कार या नावाने ही कार ओळखली जात असे आणि ती कार एका मराठी माणसानेच बनवली होती. शंकरराव कुलकर्णी असे त्यांचे नाव होते. विशेष म्हणजे शंकररावांचं शिक्षण फक्त सातवीपर्यंत झालेलं, इचलकरंजीच्या एका सातवी पास महाराष्ट्रीयन माणसाने देशाला, इतिहासातील सर्वात छोटी आणि सामान्य माणसाच्या बजेटमधली कार दिली होती. या कारची किंमत 12,000 रुपये होती. सिंगल वायपर, रिअर इंजिन, ५ सीटर, २० किमी प्रतिलिटर मायलेज ही या कारची काही महत्वाची फीचर्स होत. विशेष म्हणजे या कारचे बहुतेक महत्वाचे पार्टस देसी होते. कारचं इंजिनही भारतीय बनावटीचं होते. त्या काळात शंकरराव चव्हाण, शंतनुराव किर्लोस्कर, मोहन धारिया, राजारामबापू पाटील यांसारख्या अनेक प्रतिष्ठितांनी या कारमधून प्रवास केला होता. किर्लोस्करमध्ये काम करणाऱ्या शंकररावांनी आपल्या 15 जणांच्या टीमसोबत 1945 मध्ये कार बनवण्याच्या आपल्या कल्पनेवर काम सुरु केले.

सन 1949 मध्ये शंकररावांनी या कारचे पहिले मॉडेल तयार केले. त्यात ड्रायव्हरच्या पाठीमागच्या सीटवर दोन माणसे बसू शकत असत. पुढच्या दोन दशकांच्या काळात या मॉडेलमध्ये अनेक सुधारणा करून अद्ययावत असे अजून 5 मॉडेल त्यांनी बनवले होते. शंकररावांनी जी पहिली कार बनवली होती, तीचा आरटीओ मधला नोंदणी क्रमांक एम.एच.के.1906. असा होता. इचलकरंजीच्या रस्त्यावर ही कार शंकरराव केव्हापासूनच चालवत होते, पण व्यावसायिक पातळीवर या कारच्या निर्मितीत उतरण्यासाठी सर्वप्रथम मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे ही कार प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. त्यावेळी खंडाळा घाटातून प्रवास करत शंकररावांनी ती मुंबईत आणली होती. 1975 साली जयसिंगपूर नगरपालिकेने या कारच्या निर्मितीसाठी शंकररावांना प्लांट स्थापन करण्यासाठी जागाही उपलब्ध करून दिली होती. पण, लालफितीतला कारभार आणि नोकरशाहीचा ढिम्म प्रतिसाद यांमुळे या प्रकल्पाचे पुढे काहीच होऊ शकले नाही. मीरा कारचे मॉडेल मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात येण्यासाठी सरकारी मदतीची आवश्यकता होती. तसेच अनेक शासकीय परवानग्याही गरजेच्या होत्या. त्या मिळविण्यात शंकररावांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. याशिवाय त्याचकाळात सुझुकीसुद्धा या क्षेत्रात भारतात प्लांट सुरू करण्याच्या तयारीत असल्याने शंकररावांना सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे हा प्रकल्प तिथेच रखडला. तर, शंकररावांना अनेक आर्थिक अडचणींनाही सामोरे जावे लागले होते. 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेkolhapurकोल्हापूरmarathiमराठी