शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 1:09 AM

ज्यांनी वित्तीय संस्थांकडून पीककर्जाची उचल केली नसेल, त्यांना सरकारी निकषांनुसार मिळणाºया मदतीच्या तिप्पट रक्कम भरपाई स्वरूपात मिळणार आहे.

ठळक मुद्देकर्ज न घेतलेल्यांनाही लाभ : एक हेक्टरपर्यंत पूरग्रस्तांना दिलासा

कोल्हापूर : महापुराने नुकसान झालेल्या १ हेक्टर (अडीच एकर) आतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने पूरग्रस्त शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील सुमारे तीन लाख शेतकºयांना त्याचा लाभ होणार आहे. ज्यांनी वित्तीय संस्थांकडून पीककर्जाची उचल केली नसेल, त्यांना सरकारी निकषांनुसार मिळणाºया मदतीच्या तिप्पट रक्कम भरपाई स्वरूपात मिळणार आहे.

जिल्ह्यात ३ लाख ९१ हजार ४८० हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. यातील १ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्राला पुराच्या पाण्याचा तडाखा बसला आहे. उर्वरित पिके अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाली आहेत. जिल्ह्यात ६ लाख ६० हजार खातेदार शेतकरी आहेत. त्यातील ८४ टक्के म्हणजेच सुमारे साडेपाच लाख शेतकरी हे एक हेक्टरच्या आतील आहेत. राज्य सरकारने सोमवारी पूरबाधित शेतकºयांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. ३ लाख १३ हजार ६१० शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाचा आहे.

महापुरामुळे ऊस, भात, सोयाबीन, भुईमुगाची पिके संपली आहेत. सर्वाधिक नुकसान ऊसपिकाचे झाले असून शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. सरकारी यंत्रणेकडून पंचनामे सुरू आहेत, पण त्यातून मिळणारी भरपाई आणि प्रत्यक्ष नुकसान याची सांगड घालता येत नाही. त्यामुळे बॅँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड कशी करायची? या विवंचनेत शेतकरी असतानाच सरकारने कर्जमाफीचा महत्त्वपूर्ण निर्णय दिलासा दिला आहे.कर्जमर्यादेच्या निकषाचा अडसर?बॅँकिंग धोरणाच्या अधीन राहून वाटप केलेले कर्जच माफ होणार आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळे कर्जमर्यादेपेक्षा अधिक वाटप केलेल्या कर्जदारांची अडचण आहे, त्याचबरोबर मध्यम मुदत व खावटी कर्जाचे काय? हेही प्रश्न अधांतरीच राहणार आहेत.जिल्ह्यातील खातेदार :एकूण खातेदार : ६ लाख ६० हजार१ हेक्टरच्या आतील : ५ लाख ५४ हजार१ ते २ हेक्टरपर्यंत : ७९ हजार ४००२ हेक्टरपेक्षा अधिक : २६ हजार ६००

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी