शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जलसमाधीसाठी बळीराजाची नृसिंहवाडीकडे कूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:52 IST

कोल्हापूर : पूरग्रस्तांना भरीव मदत मिळावी, नियमित पीक कर्ज भरणाऱ्यांना तातडीने ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, यासह विविध मागण्यांकडे ...

कोल्हापूर : पूरग्रस्तांना भरीव मदत मिळावी, नियमित पीक कर्ज भरणाऱ्यांना तातडीने ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथून बुधवारी पदयात्रेला सुरुवात झाली. पंचगंगा संगमावरील दत्त मंदिरात सकाळी आठ वाजता शेट्टी यांच्याहस्ते अभिषेक झाला. त्यानंतर स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी जलसमाधी आंदोलनासाठी नृसिंहवाडीकडे पदयात्रेने कूच झाले.

पदयात्रा पाच दिवस पंचगंगा काठावरील पूरग्रस्त गावातून जाईल. यात्रेत कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकरी सहभागी होण्याच्या तयारीने पाठीला बॅग अडकवून आले होते. महिला, तरुणांचा सहभागही लक्षवेधी राहिला. दत्त मंदिरातून पदयात्रा प्रयाग चिखलीत आल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा थांबून ग्रामस्थांनी स्वागत केले. महिलांनी औक्षण केले. पुराचा सर्वाधिक फटका बसलेेले हे गाव असल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आमच्यासाठी कोणीतरी लढत आहे, हे प्रकर्षाने दिसले. एका गावाहून दुसऱ्या गावात पदयात्रा जशी पोहोचत राहिली, तशी गर्दी वाढत राहिली. वाटेवरील सर्वच गावांनी पदयात्रेचे जल्लोषी स्वागत केले. आंबेवाडीतून पदयात्रा वडणगे येथे दीड वाजता पोहोचली. तेथील पार्वती मंदिरात ग्रामस्थांनी जेवणाची व्यवस्था केली होती. तेथे जेवण करून दुपारी तीन वाजता पदयात्रा निगवे, भुयेमार्गे जात शिये येथे मुक्काम करण्यात आला.

पदयात्रेत स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिदंर पाटील, सावकर मादनाईक, संघटनेचे जिल्हाध्यक्ष जर्नादन पाटील, सागर शंभूशेठे, राजेंद्र गड्ड्यान्नावर, अजित पोवार, सचिन शिंदे, राजगोंड पाटील, वैभव कांबळे यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते.

चौकट

प्रमुख मागण्या अशा :

२०१९ च्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, पूरग्रस्तांच्या मागणीप्रमाणे विनाअट पुनर्वसन करा, कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या मार्गावर असलेल्या पुलाजवळचा भराव कमी करून तातडीने कमान पूल बांधावे, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची सरसकट फी तसेच शैक्षणिक कर्जमाफी करा, महापुराचे पाणी ज्या गावात गेले आहे, त्या संपूर्ण गावाला पूरग्रस्त गाव म्हणून घोषित करून सरसकट सर्वांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे, सामायिक खातेदार असणाऱ्या कर्जदारांचे पंचनामे होत नसल्याने कर्ज खाते ग्राह्य धरून नुकसानभरपाई द्यावी.

चौकट

शेट्टींमुळेच उसाला दर

सर्वच राजकीय पक्षांनी आमचा वापर करून घेतला आहे. पक्षाचे नेते पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या मागणीकडे

सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. म्हणून यापुढे आम्ही शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांच्या पाठीशीच राहणार असल्याचे बाळासाहेब वरूटे, राजू पाटील यांच्यासह प्रयाग चिखली, आंबेवाडी परिसरातील काही वक्त्यांनी सांगितले. शेट्टी यांच्यामुळेच ७०० रुपये प्रतिटन उसाचा भाव तीन हजारांपर्यंत कारखानदारांना द्यावा लागला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चौकट

पदयात्रेचा आजचा

मार्ग असा

आज, गुरुवारी सकाळी आठ वाजता शिये येऊन पदयात्रेला प्रांरभ होईल. तेथून शिरोली, हालोंडी, हेर्लेमार्गे जाऊन चोकाक येथे पदयात्रेचा मुक्काम होईल.