शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
3
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
6
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
7
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
8
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
11
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
12
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
14
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
15
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
16
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
17
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
18
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
19
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
20
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या तडाख्याने आजरेकरांचे जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:21 IST

गेले आठ दिवसांपासूनचा कडक उन्हाळा आजरेकरांना त्रासदायक ठरू लागला आहे. दिवसा आग ओकणाऱ्या सूर्याने घामाघूम तर मध्यरात्रीनंतर सुटणारा गार ...

गेले आठ दिवसांपासूनचा कडक उन्हाळा आजरेकरांना त्रासदायक ठरू लागला आहे. दिवसा आग ओकणाऱ्या सूर्याने घामाघूम तर मध्यरात्रीनंतर सुटणारा गार वारा यामुळे नागरिकांच्या आजारी पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. उन्हाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

प्रत्येक वर्षी होळीच्या दरम्यान वळवाचा पाऊस होता. त्यामुळे उष्णतेची तीव्रता कमी असते; पण चालू वर्षी वळवाच्या पावसाने अद्यापही हुलकावणी दिली आहे. त्यामुळे उन्हाच्या झळांमुळे नागरिक होरपळून जात आहेत. दुपारच्या वेळेत बाजारपेठेसह रस्ते ओस पडत आहेत. वातावरणातील बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. थंडी, तापाचे रुग्ण दवाखान्यातून वाढत आहेत. उन्हाच्या झळांनी दमछाक होऊन शरीराला आलेला थकवा घालविण्यासाठी शीतपेयांच्या दुकानांतून गर्दी होत आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे कलिंगडे, गाजर, बीट, काकडी यांचे दर वाढले आहेत.

दिवसभराच्या उष्म्यानंतर वातावरणात बदल होऊन रात्री ११ नंतर हवेत गारवा पसरतो. दिवसा व रात्रीच्या तापमानात मोठा फरक पडत असल्याने त्याचा थेट आरोग्यावर परिणाम होत आहे. वयस्कर व्यक्तींना या बदलत्या वातावरणाचा जास्त त्रास होत आहे. प्रचंड उन्हामुळे आजऱ्याच्या बाजारपेठेत दुपारी १२ ते ५ यावेळेत शुकशुकाट असतो.