शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंप वीज जोडणीसाठी ५० टक्के शेतकरी वेटिंगवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:23 IST

कोल्हापूर : ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गून मास’ अशी काहीशी अवस्था महावितरणची कृषी पंपांच्या वीज जोडणीबाबत झाली आहे. कोरोना व ...

कोल्हापूर : ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गून मास’ अशी काहीशी अवस्था महावितरणची कृषी पंपांच्या वीज जोडणीबाबत झाली आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे मनुष्यबळ कमी झाल्याने जोडणीची मोहीम स्लो ट्रॅकवर आली आहे. अजूनही ५० टक्के शेतकरी प्रतीक्षेत असून, ही प्रतीक्षा किमान दिवाळीपर्यंत लांबणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, गेल्या दहा महिन्यांत २० हजारपैकी ९ हजार २६६ वीज जाेडण्या पूर्ण होऊन शिवारात पाणी खेळल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे.

कृषीपंपाच्या वीज जोडणीचे आगाऊ पैसे भरुनदेखील महावितरणकडून वेळेत जोडण्या मिळत नसल्याचे गेल्या पाच वर्षांतील चित्र आहे. याविरोधात इरिगेशन फेडरेशनच्या नेतृत्वाखाली सातत्याने शेतकरी मोर्चे, आंदोलने केली आहेत, पण बैठकीत बसल्यानंतर जोडण्या लगेच देऊ, असे सांगून अधिकारी वेळ मारुन नेत आहेत. त्यामुळे कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या कोल्हापूर परिमंडळातील प्रलंबित बीज जाेडण्यांचा आकडा २० हजारांवर गेला.

शेतकऱ्यांनी बोअर मारुन, नदीला पाईपलाईन टाकून, मोटर जोडून ठेवली आहे; पण केवळ वीज नाही म्हणून तीन-तीन वर्षे महावितरणचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. तरीही यंत्रणा फारशी हलताना दिसत नाही. दरवेळी वेगवेगळी कारणे देऊन वेळ मारून नेली जाते. शेतकऱ्यांच्या संतापामुळे अखेर डिसेेंबरमध्ये जाहीर झालेल्या नव्या वीज जोडणी धोरणात प्रलंबित वीज जाेडण्या तातडीने देण्याच्या सूचना ऊर्जा मंत्र्यांनी दिल्या आहेत. तरीदेखील यंत्रणेचा वेग वाढताना दिसत नाही.

जिल्ह्यात २० हजारांवर वीज जोडण्या प्रलंबित होत्या. त्यापैकी ९ हजार २६६ वीज जोडण्या गेल्या दहा महिन्यांत जोडण्यात आल्या आहेत, तर अजूनही १० हजार ३१५ जण प्रतीक्षेत आहेत. ही टक्केवारी ५० च्या वर जात असल्याने अजून निम्मे शेतकरी कनेक्शनच्या प्रतीक्षेतच आहेत. या जोडण्या केव्हापर्यंत पूर्ण होतील, याचे उत्तर आजच्याघडीला महावितरणकडे नाही. कोरोना व लॉकडाऊनमुळे मनुष्यबळ अपुरे असल्याचाही परिणाम वीज जाेडणीच्या कामावर होत आहे. आता पुढील महिन्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर हे सर्व काम थांबणार आहे. पाऊस ऑक्टोबर, नोव्हेबरपर्यंत लांबत असल्याचे अनुभव पाहता, आता दिवाळीनंतरच नव्या वीज जोडण्यांना मुहूर्त मिळणार असल्याचे दिसत आहे.

कोल्हापूर जिल्हा

झालेल्या वीज जोडण्या : ४ हजार ६४८

प्रलंबित वीज जोडण्या : ४ हजार ८३४

सांगली जिल्हा

झालेल्या वीज जोडण्या: ४ हजार ६१८

प्रलंबित वीज जोडण्या: ५ हजार ४८१