शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

रिंग रोड प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या निविदेचा मार्ग लवकर मोकळा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 18:35 IST

मोठा गावमधील प्रकल्प बाधितांनी केडीएमसीला दिले इरादा पत्र

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रतील महत्वकांक्षी असलेल्या रिंग रोड प्रकल्पा तिस:या टप्प्याच्या कामाच्या निविदा काढण्याचा मार्ग लवकर मोकळा होणार आहे. त्यासाठी मोठागाव परिसरातील प्रकल्पबाधितांनी आज त्यांची इरादा पत्र महापालिका प्रशासनास सादर केली. ही इरादा पत्रे सादर करण्यासाठी शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने एक शिबीर आज पार पडले.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्वाचा असलेल्या रिंग रोड प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. ७ टप्पे या कामाचे आहे. त्यापैकी टप्पा क्रमांक ४ ते ७ हा दुर्गाडी ते मांडा टिटवाळा दरम्यानचा आहे. या प्रकल्पासाठी ७० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली आहे. याठिकाणी बहुतांश मार्गी लावण्यात आलेले आहे. मात्र या प्रकल्पाच्या तिस:या टप्प्याच्या कामाची निविदा अद्याप काढण्यात आलेली नाही. या प्रकल्पाचा तिसरा टप्पा हा मोठा गाव ठाकूर्ली ते दुर्गाडी असा आहे. या टप्प्याच्या कामात बाधित होणा:यांचे संमती पत्र आवश्यक आहे. महापालिकेने आत्तार्पयत तिस:या टप्प्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनापैकी ७२ टक्के भूसंपादन केले आहे. २८ टक्के भूसंपादन करणो बाकी आहे. रिंग रोड हा प्रकल्प महापालिकेच्या हद्दीत केला जात असला तरी त्यासाठी आवश्यक असलेले भूसंपादन हे महापालिकेने करुन द्यायचे आहे. महापालिकेने तिस:या टप्प्यातील ७५ टक्के भूसंपादन केल्यास तिस:या टप्प्याच्या कामाची निविदा काढली जाईल. तिस:या टप्प्यात जवळपास ६५ प्रकल्प बाधित आहे. त्यांच्याकडून प्रकल्पाच्या कामासाठी इरादा पत्र आवश्यक होते. त्यासाठी नगरसेवक म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन आज प्रकल्पबाधितांकरीता इरादा पत्र देण्याकरीता शिबीर आयोजित केले. या शिबीरास नगररचनाकार राजेश मोरे यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

नगरसेवक म्हात्रे यांनी सांगितले की, हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे प्रयत्नशील आहे. दुर्गाडी ते मांडा टिटवाळा येथील काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्याच धर्तीवर तिस:या टप्प्यातील मोठा गाव ते दुर्गाडी या दरम्यानच्या कामाला सुरुवात व्हावी. भूसंपादनाची प्रक्रिया सुकर करण्यसाठी या शिबीराचे आयोजन केले. प्रकल्पबाधितांनी त्यांच्या जागेच्या बदल्यात टीडीआर दिला जाणार आहे. या शिबीरात सुदर्शन म्हात्रे यांनी सगळ्य़ात प्रथम इरादा पत्र दिले आहे. निविदेसाठी ७५ टक्के भूसंपादनाची अट आहे. ७२ टक्के भूसंपादन पार पडले आहे. ३ टक्के भूसंपादन या शिबीरातून पूर्ण होऊन प्रकल्पाच्या निविदेचा मार्ग मोकळा होणार आहे. उर्वरीत २५ टक्के भूसंपादनाची प्रक्रियाही लवकर मार्गी लावली जाईल असा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :kalyanकल्याण