शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गाचे 50 टक्केच भूसंपादन; १३ वर्षांपासून केंद्र, राज्य शासन समन्वयाच्या अभावाचा फटका

By अनिकेत घमंडी | Updated: July 20, 2024 06:20 IST

या गतीने काम होणार असेल तर आणखी दहा वर्षे लागतील.

डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील तिसऱ्या मार्गाचे १३ वर्षांत अवघे ५० टक्केच भूसंपादन झाले आहे. केंद्र, राज्य शासन त्या मार्गाचा विकास करण्यात हात आखडता घेत आहे, असा आरोप कल्याण-कसारा व कर्जत (के-थ्री) या रेल्वे प्रवासी संघटनेने केला. त्यांनी याबाबत दिल्लीत रेल्वे बोर्डाकडे माहिती मागवली असता कामाच्या कूर्मगतीचे गुपित उघड झाले. या गतीने काम होणार असेल तर आणखी दहा वर्षे लागतील.

संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी सांगितले की, सातत्याने पाठपुरावा करूनही माहिती दिली जात नाही. त्यामुळे कल्याण-कसारा तिसरा मार्ग कुठे अडकला? स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवली जात असताना नेमके घोडे अडले कुठे, असा सवाल त्यांनी केला. कल्याण-कसारा या ६७.३५ किलोमीटर मार्गावर तिसऱ्या लाइनला २०११ मध्ये मंजुरी मिळाली, त्यासाठी सुमारे १४३५.६१ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे पत्रात म्हटले आहे. केवळ ५० टक्के भूसंपादन काम झाले असून, अजून काम सुरू असल्याचे घनघाव म्हणाले.

गेल्या १३ वर्षांत कामाची फारशी प्रगती झालेली नसून ही विकासाच्या दृष्टीने वाटचाल नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला न्याय मिळायला हवा, इथला प्रवासी पिचला जात असून त्याला होणारा त्रास, वेदना त्याचे काहीच मूल्यमापन नाही का, अशा शब्दांत घनघाव यांनी नाराजी व्यक्त केली.

...तरच जलद लोकल

कल्याण-कसारा चौथी लाइनबाबत मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन काम बघत असून त्यांचेही काम सुरू असल्याचे पत्रात म्हटले आहे. तसेच कल्याण बदलापूर ३/४ था मार्गाचे काम एमआरव्हीसी बघत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अद्याप या मार्गांवरील मार्गिकेचा पत्ता नसल्यानेही कामे कधी होणार, याकडे कोणाचेही लक्ष नाही. गर्दीचे विभाजन होणार तरी कसे? गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्ग वाढवायला हवेत तरच जलद लोकल भविष्यात बदलापूर, आसनगाव मार्गावर धावतील अन्यथा कठीण होईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :railwayरेल्वे