शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

कधी विचार केलाय का?; जपमाळेत एकशे आठच मणी का असतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 4:05 PM

विविधतेने नटलेल्या भारत देशात अनेक संस्कृती, धर्म अन् भाषा एकत्र नांदतात. त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये देवावर अनेक लोकांची श्रद्धा असते. एवढचं नव्हे तर अधात्मालाही फार महत्त्व दिलं जातं असून देवाचं नामस्मरणंही केलं जातं.

विविधतेने नटलेल्या भारत देशात अनेक संस्कृती, धर्म अन् भाषा एकत्र नांदतात. त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये देवावर अनेक लोकांची श्रद्धा असते. एवढचं नव्हे तर अधात्मालाही फार महत्त्व दिलं जातं असून देवाचं नामस्मरणंही केलं जातं. नामस्मरण करण्यासाठी विविध गोष्टींचा वापर करण्यात येतो. त्यापैकीच एक म्हणजे, जपाची माळ. देवाचं नामस्मरण करताना 108 मण्यांची जपमाळ वापरली जाते. पण तुम्ही कधी विचार केलाय का? ही माळ फक्त 108 मण्यांचीच का असते? जाणून घेऊया जपमाळेत फक्त 108 मणीच का असतात त्याबाबत... 

जप पूर्ण होणं हे मंत्रजपाची संख्या आणि हवनातील आहुतीच्या संख्येवर अवलंबून असते. जपमाळ कोणतीही असो, त्यामध्ये 108 मणी असतात. अनेकदा आपण हे ऐकतो. पण कधी विचार केला नसेल. 

अनेक मोठे साधू संतही आपल्या नावापुढे श्री श्री 108 चा वापर करतात. त्रिदेवांची आराधना करतानाही 108 नावांचा जप करण्यात येतो. यामागे वैज्ञानिक, अध्यात्मिक आणि ज्योतिषीय कारणं आहेत. जाणून घेऊया या कारणांबाबत सविस्तर... 

आपल्या कालगणनेमध्ये सूर्याला फार महत्त्व आहे. एका वर्षात सूर्य 12 राशींमध्ये फिरून 360 अंश पूर्ण करतो. याच 360 अंशांना 60 ने गुणल्यास 21600 कला पूर्ण होतात. या कला दोन आयनांमध्ये पडतात. पहिल्या सहा महिन्यांमध्ये सूर्याचे दक्षिणायन आणि पुढिल सहा महिन्यांमध्ये सूर्याचं उत्तरायन असते. एका आयनात 21 हजार 600च्या अर्धे म्हणजेच, 10 हजार 800 कला येतात. 

तसेच, सुर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सुर्योदयापर्यंत 60 घडी होतात. एका घडीत 24 मिनिटं असून एका घडीत 60 पळ आणइ एका पळात 60 विपळ असतात. अर्थातच 24 तास किंवा 60 घडीत 60 गुणिले 60 गुणिले 60 म्हणजेच 21 हजार 600 विपळ असतात. अर्थात अर्ध्या दिवसात, 12 तासात 10 हजार 800 विपळ येतात. जर शेवटचे दोन शून्य सोडले तर वर्ष आणि दिवसाच्या सूर्य संचाराच्या एकूण संख्येत 108 उरतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAdhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक