शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार निवारण समितीकडून तक्रारदारांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST

जळगाव : गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी न्यायासाठी केलेल्या तक्रारींचे कामकाज पूर्ण झालेले आहे. मात्र, तरी सुध्दा विद्यापीठातील तक्रारी ...

जळगाव : गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी न्यायासाठी केलेल्या तक्रारींचे कामकाज पूर्ण झालेले आहे. मात्र, तरी सुध्दा विद्यापीठातील तक्रारी निवारण समितीने हेतूपुरस्कर निकाल प्रलंबित ठेवला असून तो देण्यास टाळाटाळ करित असल्याचा आरोप चार तक्रारदारांनी केला आहे. दरम्यान, महिन्याभराच्या आत निकाल देण्यात यावा, अशी मागणी तक्रारदारांनी प्रभारी कुलगुरू ई-वायुनंदन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तक्रारदार डॉ.संजय भोकरडोळे, डॉ.मंजुषा आयाती, राजेंद्र गाडगीळ व सुनील जंगले यांनी गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी न्यायायासाठी विद्यापीठात तक्रारी दाखल केल्या होत्या. कायद्यानुसार तक्रार दाखल झाल्यावर ९० दिवसांच्या आत निकाल देणे बंधनकारक आहे. तथापि, या मुदतीचे भान न ठेवता तक्रार निवारण समितीने मनमानी काम सुरू केले असून अनेकवेळा निकाल जाहीर केले जाईल, असे सांगण्यात आले. परंतु, निकाल देण्यात आला नाही. तर प्रत्यक्ष उपस्थित राहून कामकाज करण्याचे समिती अध्यक्ष जाहीर करतात. परंतु, तारखेच्या दिवशी येत नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. समिती ही स्वतंत्रपणे कामकाज करीत नसून त्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्याशिवाय नकलेल्या प्रती मिळविण्यासाठी दिलेले अर्ज देखील प्रलंबित ठेवण्यात आले असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे समितीच्या अध्यक्षांना प्रत्यक्ष येऊन कामकाज करणे शक्य नसल्यास नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात यावी व महिन्याभरात तक्रारींचा निकाल देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या आहेत तक्रारी

जनसंवाद व पत्रकारिता विभागात ईडब्ल्यूएस संवर्गाच्या पदावर एससी संवर्गाच्या उमेदवाराची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जनसंवाद व पत्रकारिता विभागात सेवा बजावल्यानंतर वेतनाचा फरक दिलेला नाही. वेतनाच्या फरकाची रक्कम मिळावी ही मागणी तक्रारीत केली आहे.