शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

Video : 'ऑटोमोबाईल क्षेत्रात लवकरच मंदीऐवजी तेजी येईल', मुख्यमंत्री प्रचंड आशावादी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 11:53 AM

देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

ठळक मुद्देदेशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा केली.

भुसावळ (जळगाव) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाजनादेश यात्रेदरम्यान जळगाव दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात महाजनादेश यात्रेला लोकांचं समर्थन मिळत आहे. सरकारने केलेल्या कामांमुळेच लोकांचा पाठिंबा मिळत आहे. यापुढेही शेतकरी, पाणी, दुष्काळ, बेरोजगारी यासंदर्भातील कामे सरकारकडून प्राध्यान्याने सोडविण्यात येत आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, देशाची अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे आलेल्या मंदीच्या परिस्थितीवरही मुख्यमंत्र्यांनी मौन सोडले.  

देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बँकांना 70 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देणे असेल, अतिरिक्त संसाधनातून बँकांना 5 लाख कोटी रुपये देऊन त्यातून मोठ्या प्रमाणात इक्विटीडी आणण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे उद्योगांना आणि व्यापाराला मोठा फायदा मिळेल. व्याजाचे दर रेपोरेटशी जोडण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. रिझर्व्ह बँक रेपो रेट कमी करते. तरीही, बँकांकडून व्याजाचा दर कमी करण्यात येत नाही. गेल्या 9 वर्षातील सर्वात कमी रेपो रेट आज रिझर्व्ह बँकेने केलाय. ऑटोमोबाईल सेक्टरसाठी घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे. आता, ऑटोमोबाईल श्रेत्रात मंदीऐवजी तेजी येताना दिसेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. कन्झ्युमर सेक्टरमध्ये मोठा बदल दिसेल, असे म्हणत देशातील मंदीच्या स्थितीबाबत फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.  

मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा केली. भुसावळमधील स्थानिक मुद्द्यांपासून ते देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यापर्यंतच्या विषयांना स्पर्श केला. तसेच, विरोधकांवर हल्लाबोल करताना, नेहमीप्रमाणे मोदींचं कौतुकही मुख्यमंत्र्यानी केले. तसेच, विधानसभा निवडणुकांमध्येही महायुतील मोठं यश मिळेल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांना राज्यात ठेवायचे का? केंद्रात पाठवायचे? यासंदर्भातील निर्णय केंद्रीय नेते घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEconomyअर्थव्यवस्थाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन