शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

Video : 'ऑटोमोबाईल क्षेत्रात लवकरच मंदीऐवजी तेजी येईल', मुख्यमंत्री प्रचंड आशावादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 12:04 IST

देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

ठळक मुद्देदेशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा केली.

भुसावळ (जळगाव) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाजनादेश यात्रेदरम्यान जळगाव दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात महाजनादेश यात्रेला लोकांचं समर्थन मिळत आहे. सरकारने केलेल्या कामांमुळेच लोकांचा पाठिंबा मिळत आहे. यापुढेही शेतकरी, पाणी, दुष्काळ, बेरोजगारी यासंदर्भातील कामे सरकारकडून प्राध्यान्याने सोडविण्यात येत आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, देशाची अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे आलेल्या मंदीच्या परिस्थितीवरही मुख्यमंत्र्यांनी मौन सोडले.  

देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बँकांना 70 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देणे असेल, अतिरिक्त संसाधनातून बँकांना 5 लाख कोटी रुपये देऊन त्यातून मोठ्या प्रमाणात इक्विटीडी आणण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे उद्योगांना आणि व्यापाराला मोठा फायदा मिळेल. व्याजाचे दर रेपोरेटशी जोडण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. रिझर्व्ह बँक रेपो रेट कमी करते. तरीही, बँकांकडून व्याजाचा दर कमी करण्यात येत नाही. गेल्या 9 वर्षातील सर्वात कमी रेपो रेट आज रिझर्व्ह बँकेने केलाय. ऑटोमोबाईल सेक्टरसाठी घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे. आता, ऑटोमोबाईल श्रेत्रात मंदीऐवजी तेजी येताना दिसेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. कन्झ्युमर सेक्टरमध्ये मोठा बदल दिसेल, असे म्हणत देशातील मंदीच्या स्थितीबाबत फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.  

मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा केली. भुसावळमधील स्थानिक मुद्द्यांपासून ते देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यापर्यंतच्या विषयांना स्पर्श केला. तसेच, विरोधकांवर हल्लाबोल करताना, नेहमीप्रमाणे मोदींचं कौतुकही मुख्यमंत्र्यानी केले. तसेच, विधानसभा निवडणुकांमध्येही महायुतील मोठं यश मिळेल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांना राज्यात ठेवायचे का? केंद्रात पाठवायचे? यासंदर्भातील निर्णय केंद्रीय नेते घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEconomyअर्थव्यवस्थाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन