शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

तर अंजनी धरणात अतिरिक्त पाणीसाठा होणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:20 IST

अंजनी धरणाच्या उंचीच्या अर्ध्या भागापर्यंत पाणी साठवून त्या भागातील येणाऱ्या सोनबर्डी, हनुमंत खेडे, मजरे गावांचे व शेतीचे काही प्रमाणात ...

अंजनी धरणाच्या उंचीच्या अर्ध्या भागापर्यंत पाणी साठवून त्या भागातील येणाऱ्या सोनबर्डी, हनुमंत खेडे, मजरे गावांचे व शेतीचे काही प्रमाणात पुनर्वसन केले तर ७ ते ८ दलघमी अतिरिक्त पाणीसाठा मिळू शकतो. या अतिरिक्त पाणीसाठ्यामुळे जवळपास ७०० ते ८०० हेक्टर जास्तीची शेतजमीन सिंचनाखाली येऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे. गेल्या दोन वर्षांपासून अतिरिक्त पाणी अंजनी नदीपात्रात सोडण्यात येऊन ते वाया गेले. या वाया गेलेल्या पाण्याचा शेतजमिनीसाठी उपयोग होऊ शकतो. वास्तविक अंजनी धरणाचे काम वाढीव उंचीनुसार करण्यात आलेले आहे, परंतु प्रत्यक्षात वाढीव उंचीनुसार अंजनी धरणात पाणीसाठा केला जात नाही. धरणामध्ये अतिरिक्त साठा केल्यास सुमारे ५०० हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ शकते. या अनुषंगाने वाढीव पाणीसाठा केलेल्या उंचीनुसार विचार करता सोनबर्डी, हनुमंत खेडे, मजरे या गावांचे अंशतः पुनर्वसन करावे लागणार आहे

अंजनी धरणात अतिरिक्त पाणीसाठा केल्यास पुनर्वसन व शेतजमीन ताब्यात घेणे सोपे होईल व वाढीव उंचीसाठी धरणाच्या केलेल्या बांधकामाचा लाभ होऊ शकेल. येथील पुनर्वसनाची बाब सोडता जामदा कालवा, विस्तारीकरण व इतर अनुषंगिक बाबींवर होणारा खर्च वाचणार आहे. अंजनी पाणलोट क्षेत्रामधील शंभर टक्के पाणी अंजनी धरणातच साठवा, अशी मागणी जोर धरत आहे. अतिरिक्त वाया जाणारे पाणी साठवण्याची नितांत गरज आहे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व स्थानिक आमदार चिमणराव पाटील यांनी पुढाकार घेऊन शेती सिंचनासाठी अंजनी धरणात अतिरिक्त जलसाठा करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. अंजनी धरणामुळे एरंडोल व धरणगाव या दोन्ही तालुक्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. याशिवाय दोन्ही तालुक्यांचा कायापालट होऊन शेतीला खूपच लाभ होणार आहे.

---

बी. एस. चौधरी