शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

महामार्ग पोलिसांकडून दहा हजार चालकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 12:50 AM

महामार्ग पोलिसांनी चालू वर्षात १० हजार ९४८ वाहन चालकांवर कारवाई करून १५ लाख ७८ हजार रूपयांचा दंड आकारला आहे.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील महामार्ग पोलिसांनी चालू वर्षात १० हजार ९४८ वाहन चालकांवर कारवाई करून १५ लाख ७८ हजार रूपयांचा दंड आकारला आहे. महामार्ग विभागाच्या नव्या अध्यादेशानुसार आता राष्ट्रीय, राज्य महामार्गावर ठरवून दिलेल्या वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालविणाऱ्या चालकांवरही धडक कारवाई मोहीम हाती घेतली जाणार आहे.जालना - औरंगाबाद, जालना- अंबड, जालना- देऊळगाव राजा, जालना- मंठा, जालना- सिंदखेडराजा, जालना- भोकरदन या राज्य व जिल्ह्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वाहने चालविताना चालकांनी वेग मर्यादेचे पालन करावे, याबाबत वेळोवेळी जनजागृती केली जाते. महामार्ग विभागाच्या वतीने याबाबत नव्याने अध्यादेश जारी करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरून वाहने चालविताना कारसाठी प्रति तास ९० किमी., जीप व मालवाहतूक वाहनांसाठी प्रति तास ८० किलोमीटरची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर दुचाकीसाठी प्रति तास ७० किलोमीटरची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर राज्य महामार्गावर कारसाठी प्रति तास ७० किमी., जीप, दुचाकी व मालवाहतूक वाहनासाठी प्रति तास ६० किमीची मर्यादा ठेवण्यात आली आहे. मात्र, अनेक वाहन चालक वेग मर्यादा ओलांडून वाहने चालवित असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.चालू वर्षात जिल्ह्यातील राज्य मार्गावर ७० प्राणांतिक अपघात झाले आहेत. यात ७९ जणांचा मृत्यू झाला असून, ३६ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर प्रवासी गंभीर जखमी झालेले ६६ अपघात आहेत. यात ९६ प्रवासी, चालक गंभीर जखमी झाले आहेत. असे एकूण १३६ अपघात झाले आहेत. वाहतूक नियमांचे विशेषत: वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. हे अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांनी आता वेगमर्यादा ओलांडणाºया वाहन चालकांविरूध्द कारवाईची धडक मोहीम हाती घेण्याचा निर्धार केला आहे.ब्लॅक फिल्मची ४१ प्रकरणेमहामार्गा पोलिसांनी चालू वर्षात मर्यादेपेक्षा अधिकची ब्लॅक फिल्म बसविणा-या ४१ वाहन चालकांवर कारवाई केली आहे. तर ओव्हरस्पीड प्रकरणात केवळ चार चालकांवर कारवाई झाली आहे. मात्र महामार्ग विभागाच्या नवीन अध्यादेशानुसार व मिळालेल्या यंत्रणेचा वापर करून वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसroad transportरस्ते वाहतूकbikeबाईकcarकार