शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

Maharashtra Vidhan Sabha 2019 : सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 3:38 PM

शरद पवार यांची जालना येथे कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा 

ठळक मुद्देलोकांचे अश्रु पुसण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस हे महाजनादेश यात्रेत मग्न सोडून गेलेल्या नेत्यांना जनता निवडणुकीत धडा शिकवेल

जालना : कर्जाचा बोजा सहन होत नसल्याने राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे सरकार उद्योग धार्जिणे असून असंवेदनशील आहे. या सरकारला आगामी निवडणुकीत जनतेने धडा शिकवावा. आमची सत्ता आल्यास सरसकट कर्जमाफी देऊ, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिली. 

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, कोल्हापुर, सांगली, गडचिरोली भागात पुराने थैमान घातले होते. त्यामुळे सामान्य माणूस अडचणीत सापडला होता. अशाही स्थितीत त्या भागात जाऊन लोकांचे अश्रु पुसण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस हे महाजनादेश यात्रेत मग्न होते. त्यावेळी किल्लारी येथे पहाटे चार वाजता भुकंप झाला होता. त्यावेळी आपण मुख्यमंत्री असताना सकाळी सात वाजता तेथे पोहोचून मदत कार्याला गती दिल्याचे पवार म्हणाले. 

सरकारचा गडकिल्ल्यांचा पर्यटन स्थळात रुपांतर करण्याचा निर्णय हास्यंपद आहे. या किल्ल्यांमधून छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य इतिहास रचला होता. तेथे हे सरकार छमछम.. संस्कृती रुजू पाहत आहेत. ही खेदाची बाब असल्याचे ते म्हणाले.  केंद्र आणि राज्य सरकार उद्योजकांचे ८६ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी का ? करत नाही. असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना जनता निवडणुकीत धडा शिकवेल, असेही ते म्हणाले. एकूणच सर्व आघाड्यांवर हे सरकार अपयशी असून, तरुणांना रोजगाराची संधीही उपलब्ध करुन देत नाही. केवळ फसव्या घोषणा करुन लोकांची दिशाभूल करत असल्याने आगामी निवडणुकीत सरकारला खाली खेचण्याचे आवाहन त्यांनी केले. विरोधी पक्ष नेते धनजंय मुंढे यांनीही सरकारवर चौफेर टिका करत सरकारचे धेय धोरण हे शेतकरी आणि तरुणांच्या हिताचे नसल्याचे ते म्हणाले. यावेळी आ. राजेश टोपे यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalanaजालनाFarmerशेतकरीagricultureशेती