शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात वडील गेले, आता अपघातात आईचेही छत्र हरवले, सात मुले झाली पोरकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 14:48 IST

वारकऱ्यांची जीप विहिरीत कोसळून एकाच गावातील पाच जणांचा मृत्यू झाला, गावावर दु:खाचा डोंगर काेसळल्याने एकही चूल पेटली नाही.

- राहुल वरशिळजालना : जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबांवर मोठा आघात झाला. काही पाल्यांचे आई-वडील असे दोन्ही छत्र हरवले, तर काहींनी घराचा एकमेव आधार असलेले वडील गमावले. अशीच एक घटना बदनापूर तालुक्यातील चनेगाव येथेही घडली होती. यात २०२०मध्ये घरातील कर्ता पुरुष वडील बाळू तायडे (वय ४५) गेल्याने सात मुले व पत्नी पाेरकी झाली होती. त्या दु:खातून कसेबसे सावरत नाही तोच गुरुवारी सायंकाळी जालना - राजूर रोडवर झालेल्या अपघात पत्नी नंदाबाई बाळू तायडेे (वय ४०) यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे आता सातही मुले कायमची पोरकी झाली आहेत. काळाने गुरुवारी घाला घातल्याने एकाच गावातील पाच जणांचा मृत्यू झाला असून, गावावर दु:खाचा डोंगर काेसळल्याने एकही चूल पेटली नाही.

नंदाबाई तायडे यांचे जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण माहेर असून, २००२ मध्ये चनेगाव येथील बाळू तायडे यांच्याशी विवाह झाला होता. त्यानंतर त्यांचा सुखी संसार सुरू होता. यादरम्यान या दाम्पत्याला पाच मुली व दोन मुलगे झाले. या सर्व मुलांचे शिक्षण दोघे पत्नी-पत्नी आनंदाने ऊसतोड आणि मजुरी करून करीत होते. हे दाम्पत्य सुखी संसाराचा गाडा हाकत होते. परंतु, कोरोनाकाळात वडील बाळू तायडे यांच्यावर काळाने घाला घातला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आई नंदाबाई यांनी पाचपैकी दोन मुलींचे लग्न केले आहे, तर इतर पाच जणांचे शिक्षण सुरू आहे.

खासदारांनी उचलली पुढील शिक्षणाची जबाबदारीबदनापूर येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात एक मुलगी इयत्ता बारावी, दुसरी आठवीमध्ये आणि तिसरी मुलगी जालना येथे दहावीमध्ये शिकत आहे. तर एक मुलगा पाचवी आणि सर्वांत लहान तिसरीच्या वर्गात आहे. आता या मुलांच्या पुढील शिक्षणाचा सर्व खर्च खासदार डॉ. कल्याण काळे करणार असल्याचे त्यांनी स्वत: अंत्यसंस्काराला उपस्थित राहून जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे गजानन गीते यांनीही आपल्या संस्थेमध्ये बारावीपर्यंत मोफत शिक्षण देणार असल्याचे सांगितले.

आता आम्ही कुणाला मम्मी म्हणावंजालना - राजूर रोडवर गुरुवारी झालेल्या अपघातात एकाच गावातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली होती. या पाचही मृतदेहांवर शुक्रवारी सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी गावात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यात नंदाबाई तायडे यांच्यावर अंत्यसंस्कार करत असताना त्यांची सातही मुले आता आम्ही कुणाला मम्मी म्हणावं... अस म्हणून टाहो फोडत होती. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी उपस्थित झालेल्या सर्व महिलांसह नागरिकांनाही गहिवरून आले.

नंदाबाईंच्या मुलांना अकरा लाखांची मदतगुरुवारी झालेल्या अपघातात नंदाबाई तायडे यांचा मृत्यू झाल्याने त्यांची सात मुले पोरकी झाली. त्यामुळे शुक्रवारी अंत्यसंस्काराला उपस्थित असलेले खासदार डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार संतोष सांबरे, भाजपचे जालना विधानसभाप्रमुख भास्कर दानवे, उध्दवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी प्रत्येकी एक लाख आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख अशी एकूण ११ लाखांची मदत जाहीर करून सर्वांनी त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalanaजालना