शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 13:07 IST

Pahalgam Terror Attack News : २६ पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सिंधू नदीचे पाणी रोखले असून, दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशातील तणाव वाढल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे.

Pahalgam Terror Attack Donald Trump: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सावध भूमिका घेताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाबद्दल विचारण्यात आले. तेव्हा ट्रम्प म्हणाले की, हा हल्ला खूप वाईट आहे. पण, मी भारताबरोबरच पाकिस्तानसाठीही खूप जवळचा आहे. भारत आणि पाकिस्तान त्यांच्या पातळीवर मिटवून घेतील, अशी भूमिका ट्रम्प यांनी मांडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारासाठी व्हॅटिकन सिटीकडे विमानाने जात होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारत पाकिस्तान यांच्यातील तणावाबद्दल त्यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली. 

वाचा >> "जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी

काश्मीर मुद्द्यावरून दोघांमध्ये अनेक वर्षांपासून संघर्ष -ट्रम्प

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'मी भारतासाठी खूप जवळचा आहे आणि पाकिस्तानसाठीही. जसे की तुम्हाला माहिती आहे, काश्मीर प्रश्नावरून दोन्ही देशांमध्ये मागील अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. काश्मीर प्रश्न अनेक वर्षांपासूनचा आहे. पण, जो दहशतवादी हल्ला झाला, तो खूपच वाईट आहे. खूपच वाईट झाले.'

ट्रम्प म्हणाले, 'मी दोन्ही नेत्यांना ओळखतो'

भारत पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावाबद्दल ट्रम्प म्हणाले, 'त्यांच्या सीमेवर अनेक वर्षांपासून तणावपूर्ण परिस्थिती आहे. नेहमीच अशी स्थिती राहिलेली आहे. पण मला विश्वास आहे की, ते (भारत-पाकिस्तान) कोणत्या न कोणत्या पद्धतीने यातून मार्ग काढतील. मी दोन्ही नेत्यांना ओळखतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता असलेला तणाव हा नेहमीच राहिलेला आहे.'

इराणने दिला मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेल्यानंतर इराणने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सईद अब्बास अराघची यांनी म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तान बंधुत्व असलेले शेजारी आहे. दोन्ही देशात शांतता आणि स्थिरता राहावी, हीच इराणची प्राथमिकता आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्ला