शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

'रात्री १ वाजता फोन केला तरी...'; बुर्ज खलिफाच्या निर्मात्यांनी सांगितलं भारतीयांना नोकरी देण्याचं 'खास' कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 16:34 IST

बुर्ज खलिफाच्या मालकाने सांगितलं भारतीय टॅलेंटचं असं गुपित की जग थक्क होईल!

Emaar Hiring Strategy: जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा उभारणारे आणि एमार प्रॉपर्टीजचे संस्थापक मोहम्मद अलाब्बार यांनी भारतीय कर्मचाऱ्यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले आहे. भारतीय कर्मचाऱ्यांचे समर्पण आणि कामाप्रती असलेली जिद्द जगात सर्वश्रेष्ठ आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला अनुभव मांडला.

अबू धाबी येथे आयोजित मेक इट इन द एमिरेट्स २०२६ या शिखर परिषदेत अलाब्बार बोलत होते. यावेळी त्यांनी आपली कंपनी भारतीय टॅलेंटला प्राधान्य का देते, याचे कारण स्पष्ट केले.

'टॅलेंटपेक्षा मेहनत श्रेष्ठ'

मोहम्मद अलाब्बार यांनी भारतीयांच्या गुणवत्तेवर भाष्य करताना सांगितले की, व्यवसायातील यश हे केवळ बुद्धिमत्तेवर अवलंबून नसते, तर ते सातत्य आणि परिश्रमावर अवलंबून असते. त्यांनी स्वतःचे उदाहरण देताना म्हटले की, "माझा आयक्यू सरासरी आहे, पण माझी मेहनत जगातील सर्वोत्तम आहे. मी कठोर परिश्रमावर विश्वास ठेवतो." त्यांच्या मते, जर हुशार माणसाने मेहनत केली नाही, तर कष्टाळू माणूस त्या हुशार माणसालाही मागे टाकतो.

रात्री १ वाजताचा 'तो' कॉल अन् भारतीयांची जिद्द

भारतीय कर्मचाऱ्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य सांगताना अलाब्बार म्हणाले, "मला भारतीयांना कामावर ठेवायला का आवडते? कारण ते कामासाठी कमालीचे समर्पित आहेत. जर मी त्यांना रात्री एक वाजताही फोन केला, तर ते उत्तर देण्यासाठी उपलब्ध असतात. कामाप्रती असलेली ही जबाबदारीची जाणीवच भारतीयांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते."

भारत सर्वात मोठी आणि स्थिर बाजारपेठ

फक्त कर्मचारीच नाही, तर जागतिक बाजारपेठ म्हणूनही अलाब्बार यांनी भारताला पसंती दिली. "आजच्या घडीला भारतापेक्षा मोठी, स्थिर आणि वेगाने प्रगती करणारी दुसरी कोणती बाजारपेठ आहे का? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे," असे ते म्हणाले.

संकटातील मजबुती महत्त्वाची

२००८ ची जागतिक मंदी आणि कोरोना महामारीचा उल्लेख करत अलाब्बार यांनी सांगितले की, अनिश्चित वातावरणात केवळ त्याच कंपन्या टिकतात ज्या सतर्क असतात. भारतीय व्यावसायिकांची नवीन तंत्रज्ञान शिकण्याची ओढ आणि कठीण काळात खंबीरपणे उभे राहण्याची वृत्ती, यामुळे दुबईपासून युरोपपर्यंतच्या एमारच्या प्रत्येक मोठ्या प्रकल्पात भारतीयांचा बोलबाला असल्याचे त्यांनी मान्य केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Burj Khalifa's builder reveals why Indians are preferred employees.

Web Summary : Emaar's Mohamed Alabbar praises Indian workers' dedication and work ethic, citing their availability even late at night. He highlights India's stable market and resilience during crises, emphasizing Indian professionals' crucial role in Emaar's global projects.
टॅग्स :DubaiदुबईIndiaभारत