शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी घालणार राज्य शासनाचे श्राद्ध; सरसकट कर्जमुक्तीसाठी सुरू आहे अन्नत्याग आंदोलन

By विजय पाटील | Updated: December 9, 2023 16:52 IST

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे  शेतीमालाला शासन योग्य भाव देत नाही त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ

हिंगोली: महाराष्ट्रातील शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडला असून कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे परंतु शासनाला मात्र शेतकऱ्यांची कीव येत नाही. यासाठी तर सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे शेतकऱ्यांनी शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. अन्नत्याग आंदोलनाची दखल शासनाने घेतली नसल्यामुळे रविवारी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकरी बांधव राज्य शासनाचे श्राद्ध घालणार आहेत.

गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर गजानन कावरखे , संजय मुळे , रामेश्वर कावरखे , मदन कावरखे , अक्षय पाटील सुनील मधुरवाड आदी शेतकऱ्यांनी  मागणीसाठी सरसकट कर्जमाफीच्या मागणी साठी अन्नत्याग आंदोलन ८ डिसेंबर पासून सुरू केले आहे. दरम्यान गोरेगाव सह परिसरातील शेतकऱ्यांचा पाठिंबा दिला जात असून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली जात आहेत.

गत चार वर्षांपासून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी तर पाऊस कमी झाला दुसरीकडे विविध रोगांमुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव झाला आणि सोयाबीन हातचे गेले. कापूस तुरीचीही तीच अवस्था आज जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. खरीप हंगामाने साथ सोडली असली तरी रब्बी हंगामात शासन शेतकऱ्यांना मदत करेल, शेतमालाला योग्य भाव देईल असे वाटले होते. परंतु, शासन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करत आहे. शेतकरी सध्या कर्जबाजारी झाला असून बँकेचे कर्ज कसे फेडावे या अभी वंचित आहे. शेतकरी जगला तर देश जगेल असे शासन करते म्हणत असले तरी शेतकऱ्यांना शासनाचा कवडीचाही आधार राहिला नाही उलट आंदोलन करत्या शेतकऱ्यांवर शासन गुन्हे दाखल करत आहे. एवढेच काय आंदोलन करू नका, असेही सांगत आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे  शेतीमालाला शासन योग्य भाव देत नाही त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे मागच्या दोन आठवड्यांपूर्वी गोरेगाव व परिसरातील सात ते आठ शेतकरी अवयव विक्रीसाठी मुंबई येथे गेले होते परंतु शासनाने मुंबई येथे गेलेल्या शेतकऱ्यांवर दडपशाही करत त्यांचे आंदोलन मोडीत काढले यापुढे जर आंदोलन केले तर तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असाही इशारा यावेळी शासनकर्त्यांनी दिला पोलीस बाळाचा वापर वारंवार हे सरकार करत आहे अशावेळी शेतकऱ्यांना आत्महत्या शिवाय पर्याय राहिला नाही. आत्महत्या रोखायचे असतील तर शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करून महाराष्ट्र कर्जमुक्त करावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे.

रविवारी घातली जाणार शासनाचे श्राद्ध...महाराष्ट्र तील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे यासाठी शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे या मागणीसाठी आठ डिसेंबर पासून गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे. दहा डिसेंबर रोजी अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस आहे शासनाने या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला नाही तर सकाळी ११ वाजता शासनाचे येतोचितपणे श्राद्ध घालण्यात येणार आहे.- गजानन कावरखे, गोरेगाव

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीState Governmentराज्य सरकार