शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

दररोज काहींच्या नशिबी शिवभोजन थाळीही राहत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST

हिंगोली: कोरोना काळात गरीब व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली आहे. या उपक्रमास जिल्ह्यात चांगला ...

हिंगोली: कोरोना काळात गरीब व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली आहे. या उपक्रमास जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असला तरी काहींच्या नशिबी मात्र शिवभोजन थाळीही राहत नाही, अशी प्रतिक्रिया लाभार्थींनी दिली. दुसरीकडे शिवभोजन थाळी वाढवून द्यावी, अशी मागणीही केंद्र चालकांनी शासनाकडे केली आहे.

गिबांना रोजच्या रोज अन्न मिळावे हा उद्देश समोर ठेवून शासनाने शिवभोजन थाळी मोफत सुरू केली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कळमनुरी ३, हिंगोली ३, वसमत २, सेनगाव १ आणि औंढा येथे २ असे शिवभोजन थाळीचे केंद्र उघडण्यात आले आहेत. शिवभोजनाची वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. शिवभोजन थाळीसाठी वेळ कमी ठेवण्यात आला असल्यामुळे काहींंच्या नशिबी थाळी राहत नाही. शिवभोजन थाळीमध्ये २ पोळ्या, १ भाजीे, वरण आणि भात असे पदार्थ ठेवले आहेत. थाळीतील जेवण रुचकर असल्याची प्रतिक्रियाही लाभार्थिनी दिली. दुसरीकडे थाळीतील भाजी व पोळ्यांची संख्या वाढविल्यास पोटभर जेवण मिळेल, असे काही लाभार्थींचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळीकेंद्र -११

रोजच्या थाळी लाभार्थींची संख्या १२००

शहरातील एकूण शिवभोजन केंद्र- ३

शहरातील थाळी लाभार्थींची संख्या ४००

अंदाजे १५ जण उपाशी परतात...

हिंगोली शहरात नाईकनगर, सरकारी दवाखाना व नगर परिषद कॉम्प्लेक्स येथे शिवभोजन थाळी केंद्र कार्यान्वित आहे. जेवणासाठी ११ ते ४ अशी वेळ दिली आहे. बहुतांशवेळा वेळेअभावी व थाळी संपल्यामुळे जवळपास जवळपास १५ जणांना जेवण न करताच घरी परतावे लागते. शिवभोजन थाळीमध्ये सध्या दोन पोळ्या व एक भाजी दिली जात आहे. शासनाने या शिवभोजन थाळीत तीन पोळ्या व एक भाजी वाढवून दिल्यास जेवण पोटभर होईल, असे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. शिवभोजन केंद्रावरील थाळी संपल्यास काहींना उपाशीपोटीच परतावे लागत आहे.

रोज १ हजार ६०० लोकांचे भरते पोट; मग बाकीच्यांचे काय?

शासनाने गरिबांसाठी शिवभोजन थाळी सुरू केली आहे. यामुळे गरिबांना अन्न मिळत आहे. जिल्ह्यातील ११ केंद्रांवर जवळपास १ हजार ६०० जण रोज जेवण करतात. केंद्र चालकांना शासनाकडून १५० शिवभोजन थाळी मिळते. पण ती थाळी अपुरी पडत आहे. शासनाने गरीबांचा विचार करून आणखी ७५ थाळी वाढवून देणे गरजेचे असताना मागणीचा काही शासन विचार करीत नाही, असे केंद्र चालकांचे म्हणणे आहे.

फाेटाे नं. ०७