शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

उपासमारीमुळे ग्रामस्थांनी गाव काढले विक्रीला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 6:02 AM

ग्रामस्थांवर उपासमारीची पाळी आल्याने त्यांनी चक्क गावच विक्रीला काढून सरकारकडे इच्छामरणाची परवानगी मागितल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

सेनगाव : सलग चार वर्षांपासूनचा दुष्काळ, त्यातून आलेली नापिकी, कर्जबाजारीपणा आणि बेरोजगारी अशा दुष्टचक्रात सापडलेल्या ताकतोडा (ता. सेनगाव) येथील ग्रामस्थांवर उपासमारीची पाळी आल्याने त्यांनी चक्क गावच विक्रीला काढून सरकारकडे इच्छामरणाची परवानगी मागितल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा (ता. सेनगाव) हे सुमारे हजार-बाराशे लोकसंख्येचे गाव. शेती हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन. तीही कोरडवाहू. दुष्काळ त्यांच्या पाचवीला पुजलेला. पावसाच्या चार थेंबांवर आलेल्या कपाशी, सोयाबीनवर वर्षभराची गुजराण अवलंबून. मात्र गेली सलग चार वर्षे या गावाकडे पाऊस फिरकलाच नाही. यंदाही जुलै महिना संपत आला तरी पावसाच्या थेंबाची आणि मातीची गाठभेट झालेली नाही. परिणामी पेरण्यासुद्धा खोळंबल्या आहेत. ज्यांनी पेरणी केली त्यांची पिके पाण्याअभावी करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. मागच्या वर्षात गंभीर दुष्काळ असूनही शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ अद्यापही मिळाला नाही. बँकांच्या आडमुठ्या धोरणांमुळे पीककर्जापासूनही शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी खासगी सावकाराकडून कर्ज काढून पेरण्या केल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या जमिनी व घरे खासगी फायनान्स व सावकाराकडे गहाण पडले आहे. सेनगाव तालुक्यातील अनेक ग्रामस्थ व युवक कामाच्या शोधात महानगराकडे वळले आहेत. मात्र ताकतोडा येथील ग्रामस्थांनी भुईच्या ओढीने गाव अद्याप सोडलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.शेतकºयांना सरसकट कर्जमाफी, पीकविमा, खासगी फायनान्स व सावकाराकडील कर्ज माफ करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी १८ जुलै रोजी सेनगाव तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मागण्या मान्य कराव्यात, अथवा आम्हाला इच्छामरणाची व गाव विकण्याची परवानगी द्यावी, असा त्यांचा आग्रह आहे.>...तोपर्यंत शाळा, कार्यालये बंद!जोपर्यंत मागन्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत गावातील शासकीय कार्यालये व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.ग्रामपंचायत कार्यालयाच्या भिंतीवर एक पोस्टर लावण्यात आले आहे. त्यावर ‘मुख्यमंत्री साहेब, आमचे गाव शेतजमिनीसह विकत घ्या’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ