शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अनेकदा प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही? चिंता सोडा; जेवणाच्याआधी फक्त 'या' ७ गोष्टी लक्षात ठेवा

By manali.bagul | Updated: December 10, 2020 12:05 IST

Health Tips in Marathi : जसजसे दिवस निघत जातात तसतसं कॅलरीजयुक्त, गोड पदार्थ खाण्यास सुरूवात होते. जास्तीत जास्त लोक हे  रात्रीच्या जेवणात अनहेल्दी  पदार्थांचा समावेश करतात.

वजन कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो  करत असतो. अनेकजण हेल्दी आहार घेऊन दिवसाची सुरूवात करतात.  जसजसे दिवस निघत जातात तसतसं कॅलरीजयुक्त, गोड पदार्थ खाण्यास सुरूवात होते. जास्तीत जास्त लोक हे  रात्रीच्या जेवणात अनहेल्दी  पदार्थांचा समावेश करतात. ओव्हरइटिंगमुळे वजन कमी करणं कठीण होतं. आज आम्ही तुम्हाला जेवणाच्यावेळी कोणत्या गोष्टींची काळजी घेतल्यास वजन कमी होऊ शकतं याबाबत सांगणार आहोत.

१) वजन कमी करण्यासाठी तुम्ही कॅलरीजची एक मर्यादा ठेवायला हवी.  रात्रीच्यावेळी दोन घास कमी खा. ओव्हरइटींग करू नका. जास्तीत जास्त पौष्टीक आणि हलक्या पदार्थांचा  आहारात समावेश करा. 

२) जेवण बनवताना तुम्ही  ज्या तेलाचा वापर करता. त्या तेलात किती प्रमाणात कॅलरीज आहेत. हे आधी पाहून घ्या. जर तुम्ही जास्त तळलेले पदार्थ दुपारच्या आणि रात्रीच्या  जेवणासाठी खात असाल तर तुमचं वजन कधीच  कमी होणार नाही. ऑलिव ऑईल, नारळाचं तेल किंवा कोणतंही तेल असो.  जेवणात  तेलाचे प्रमाण कमीत कमी असायला हवं.

३) रात्रीचे जेवण आणि दुपारच्या जेवणा दरम्यान आपण काय आणि किती खाल्ले याचा आपल्या वजनावर परिणाम होतो. जर आपण दुपारच्या जेवणामध्ये आणि रात्रीच्या जेवणात खूप गॅप घेत असाल तर जास्त भूक लागल्यामुळे रात्रीच्या वेळी तुम्ही जास्त खाणे सुरू कराल. म्हणून संध्याकाळी स्नॅक्स वेळेवर घ्या.

सोफा, खुर्चीपेक्षा जास्त फायदेशीर ठरतं जमिनीवर बसणं; जाणून घ्या 'ही' ४ वैज्ञानिक कारणं

४) अनेकदा पिण्याच्या पाण्याचे महत्व लोकांना कळत नाही. पाणी फक्त आपल्याला हायड्रेटेड ठेवत नाहीत तर आपल्याला आजारांपासून लांब ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं आणि कमी खाण्यास मदत करतात. जेवणाच्या ३० मिनिटांपूर्वी एक मोठा ग्लास भरून पाणी प्या. 

५) अन्न नेहमी शांत मनाने खावे. जेवताना कधीही टीव्ही पाहू नये. त्यामुळे आपले पोट कधी भरलेले आहे हे देखील आपल्याला कळत नाही आणि आवश्यकतेपेक्षा जास्त खाल्लं जातं. काळजीपूर्वक खाल्ल्याने तुम्ही तुमच्या कॅलरीचे सेवन आरामात करू शकता.

कोरोनापासून बचावासाठी 'हा' नवा नियम पाळावाच लागणार; WHO च्या तज्ज्ञांची माहिती

६) झोपायच्या वेळेच्या २ तास आधी रात्रीचे जेवण संपवा. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर ७ वाजतापर्यंत नियमित जेवण करा आणि झोपायला जा. उशिरा जेवल्यानंतर लगेच झोपायला गेल्याने  लोकांचे कधीही वजन कमी  होत नाहीत.

७) एका संशोधनानुसार असे आढळले आहे की इतर कार्बपेक्षा बटाटे जास्त खाल्ल्याने पोट पूर्ण भरले जाते. बटाटे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो हा गैरसमज आहे. याउलट, त्यात भरपूर फायबर आणि चांगल्या प्रतीचे कार्ब असतात. आपल्याला फक्त कमी प्रमाणात खाण्याची आवश्यकता आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स