शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जेवण केल्यावर आंघोळ केल्यानं काय होतं? तुम्हीही करत असाल तर लगेच वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:54 IST

Eating Tips : आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अपर्णा पद्मनाभनी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. बरेच लोक जेवणानंतर आंघोळ करतात. पण ही सवय चूक की बरोबर याबाबत त्यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

Bath After Meal Side Effects : आयुर्वेद आरोग्य चांगलं ठेवण्याचा खजिना मानलं जातं. कारण यात जीवन कसं जगायचं आणि आरोग्य कसं निरोगी ठेवायचं याबाबत खडान् खडा माहीत दिली गेली आहे. म्हणूनच गेल्या अनेक वर्षांपासून भारतात लोक आयुर्वेदातील सल्ले फॉलो करतात. तुम्ही अनेकदा घरातील वृद्धांकडून ऐकलं असेल की, रात्री उशीरापर्यंत जागू नये, रिकाम्या पोटी झोपू नये, सकाळी आंघोळ करूनच जेवण करावं. जर तुम्ही याकडे आतापर्यंत दुर्लक्ष केलं असेल तर मोठी चूक करत आहात.

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अपर्णा पद्मनाभनी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. बरेच लोक जेवणानंतर आंघोळ करतात. पण ही सवय चूक की बरोबर याबाबत त्यांनी महत्वाची माहिती दिली आहे.  त्यांनी लिहिलं की, जेवण केल्यानंतर आंघोळ करणं ही चुकीच्या क्रियांपैकी एक आहे. आयुर्वेदात या सवयीला संधीवात किंवा त्वचा रोग होण्याचं मुख्य कारण म्हटलं आहे.

जेवणानंतर का करू नये आंघोळ?

तज्ज्ञांनी सांगितलं की, रिसर्चनुसार जेवण केल्यानंतर आपल्या शरीराचं तापमान 2 डिग्रीपर्यंत वाढतं. याने जेवण पचवण्यात मदत होते. जेव्हा पोटात पचनक्रिया सुरू असते तेव्हा ब्लड फ्लो सुद्धा वेगाने होत असतो.

आयर्वेद काय सांगतं?

तज्ज्ञांनी सांगितलं की, आयुर्वेदानुसार जेवण केल्यावर लगेच आंघोळ केल्याने पचनक्रिया हळुवार होते. ज्यामुळे अन्नातील पोषक तत्व शरीराला प्रभावीपणे मिळत नाहीत. शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. जसे की, संधीवातापासून ते त्वचासंबंधी रोग.

तज्ज्ञ सांगतात की आयुर्वेदानुसार, जेवणाआधी आंघोळ केल्याने तुम्ही निरोगी रहाल. तसेच तुम्ही पोटभर आरामात जेवणही करू शकता. डॉ. अपर्णा यांनी सांगितलं की, जड काही जेवल्यानंतर जवळपास 2 ते 3 तासांपर्यंत आंघोळ करू नये. तर ब्रेकफास्टनंतर 1 तासापर्यंत आंघोळ न केल्यानेही तुमचं आरोग्य चांगलं राहतं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स