शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजाची अवकृपा कायम

By admin | Updated: July 18, 2014 00:09 IST

मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस बरसत असला तरिही वरुणराजाने अद्यापही आपली दमदार हजेरी लावली नाही. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. पावसाअभावी आतापर्यंत जिल्ह्यातील

केवळ आठ टक्के रोवण्या : पाऊस लांबल्यास परिस्थिती बिकट
गोंदिया : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस बरसत असला तरिही वरुणराजाने अद्यापही आपली दमदार हजेरी लावली नाही. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. पावसाअभावी आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ आठ टक्केच रोवणीची कामे पूर्ण झाली असून अजूनही ९२ टक्के रोवण्या शिल्लक आहेत. पाऊस लांबल्याने रोवणीची कामे पूर्णत: खोळंबली आहेत.
जिल्ह्यातील शेती आजही बऱ्याच प्रमाणात वरथेंबी पावसावर अवलबंून आहे. त्यामुळे पाऊस समाधानकारक पडल्यास उत्पन्न चांगले होते हे आजवरचे चित्र आहे. मात्र यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच हुलकावणी दिल्याने आधी पेरणी व आता रोवणीचे कामे खोळबंली आहेत. शेतकरी बांधव १५ जुलै पासून रोवणीच्या कामाला सुरुवात करतात. रोवणी करण्याची अंतीम मुदत १५ आॅगस्ट पर्यंत असते. यापेक्षा उशीर झाल्यास उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता असते. यावर्षी मात्र अद्याप केवळ आठ टक्के रोवणी झाली असून अजूनही ९२ टक्के रोवण्या शिल्लक आहेत. यामुळेच शेतकऱ्यांनी आवत्यांवर भर दिला असून सुमारे ६० टक्के आवत्या झाल्या आहेत. तर पावसाचे प्रमाण देखील सरासरी १८५ आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार आतापर्यंत ५५० मिमी. पाऊस झाला असता तर रोवणीचे चित्र चांगले असते. मात्र यावर्षी दररोज ढगाळ वातावरण राहत असून पाऊस पडत नसल्याने चिंता वाढली आहे. येत्या आठ दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास धानाच्या पऱ्ह्यावर किड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकऱ्यांचीच केवळ रोवणीची कामे सुरु आहे.
तर जवळपास ९२ टक्के शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे येत्या आठ-दहा दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळी परिस्थितीची टांगती तलावर कायम आहे. (शहर प्रतिनिधी)