शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

एसीबीने उघडकीस आणली २.३२ कोटींची अपसंपदा

By admin | Updated: July 18, 2014 00:08 IST

काम करून देण्यासाठी चहा-पाण्याच्या नावावर सुरू असलेल्या गैरव्यवहारांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करडी नजर ठेऊन आहे. जिल्ह्यात अशा २४ व्यवहारांवर या विभागाने कारवाई करून

कारवायांचे फलित : सर्वाधिक संपत्ती पऱ्हाटेंकडे, बहुतांश प्रकरणे न्यायालयात प्रलंबित
कपिल केकत - गोंदिया
काम करून देण्यासाठी चहा-पाण्याच्या नावावर सुरू असलेल्या गैरव्यवहारांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करडी नजर ठेऊन आहे. जिल्ह्यात अशा २४ व्यवहारांवर या विभागाने कारवाई करून त्यातून दोन कोटी ३१ लाख ७८ हजार ८९९ रूपयांची अपसंपदा उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक संपत्ती अभियंता दीपक पऱ्हाटे यांची असल्याचे दिसते.
एखाद्या शासकीय किंवा खाजगी कार्यालयातील अडलेले काम करवून घेण्यासाठी त्या मोदबल्यात संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून पैसा मागणे ही सामान्य बाब झाली आहे. कायद्याच्या भाषेत याला ‘लाच’ म्हटले जाते. आजघडीला हा प्रकार दररोजच्या व्यवहारातील एक भाग झाला आहे. लाच न मागता क्वचितच कुणी कामे करून देत असतील यावर सर्वसामान्यांचा विश्वासच बसणार नाही अशी स्थिती झाली आहे. या लाच मागणाऱ्यांवर लगाम घालून असे व्यवहार संपुष्टात यावे यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना करण्यात आली आहे.
एखाद्या कामाच्या मोबदल्यात अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास संबंधित व्यक्तीने विभागाकडे तक्रार करायली हवी. मात्र असे केल्यास समोरचा अधिकारी किंवा कर्मचारी आपली ‘खुन्नस’ ठेवणार व आपले काम होऊ देणार नाही अशी भिती मनात ठेऊन नागरिक तक्रार करण्यास घाबरतात. त्यामुळे चहा-पाण्याचा हा व्यवहार एक औपचारिकताच झाला आहे. याला घालण्यात आता एसीबीला बरेच यश येत आहे.
शासनाने सन २००९ पासून गोंदिया जिल्ह्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे स्वतंत्र कार्यालय दिले. मात्र नागरिकांच्या मनातील भिती आड येत असल्याने मागील साडेचार वर्षांत पाहिजे त्या प्रमाणात कारवाया करता आल्या नाही. मात्र तक्रार केल्यानंतर विभाग तक्रारदाराच्या पाठीशी राहून त्यांचे अडलेले काम सुद्धा करवून देण्याची हमी दिली जात असल्याने आता नागरिकांच्या मनातली भिती निघत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सन २०१४ च्या सहा महिने १५ दिवसांच्या काळात या विभागाने नऊ कारवाया केल्या. सन २००९ पासून अद्यापपर्यंत करण्यात आलेल्या २५ कारवायांत विभागाने लाचखोरीत अडकलेल्यांची दोन कोटी ३१ लाख ७८ हजार ८९९ रूपयांची अपसंपदा उघडकीस आणली आहे.
यामध्ये सन २०१० मध्ये करण्यात आलेल्या कारवाईत २४ लाख चार हजार ६८२ रूपयांची तर सन २०१२ मध्ये ८४ लाख ३१ हजार ५७० रूपयांची अपसंपदा उघडकीस आणली. जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई अभियंता दीपक पऱ्हाटे यांच्यावरील आहे. विभागाने त्यांच्याकडील एक कोटी २३ लाख ४२ हजार ६४७ रूपयांची अपसंपदा उघडकीस आणली. अशा प्रकारे एकूण दोन कोटी ३१ लाख ७८ हजार ८९९ रूपयांची अपसंपदा विभागाने उघडकीस आणली आहे.