शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे खुलेआम वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:25 AM

बाराभाटी : जवळच्या येरंडी-देवलगाव गावात अनेक दिवसांपासून टिल्लूपंपांचा खुलेआम वापर सुरू आहे, पण या प्रकाराकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. ...

बाराभाटी : जवळच्या येरंडी-देवलगाव गावात अनेक दिवसांपासून टिल्लूपंपांचा खुलेआम वापर सुरू आहे, पण या प्रकाराकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, गावातील अनेक नळ कनेक्शनधारकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. येरंडी येथे गावात दोन पाणीपुरवठा याेजना कार्यान्वित आहेत. मात्र, ग्रामपंचायतीची लघू पाणीपुरवठा ही योजना २५ वर्षांपासून सुरू आहे, पण नळ योजनेवर टिल्लू पंप लावून पाणी नेले जात असल्याने, अन्य नळ कनेक्शनधारक पाण्यापासून वंचित राहात आहेत. या संदर्भात अनेकदा ग्रामपंचायतीकडे तक्रार करण्यात आली. मात्र, त्याची अद्याप दखल घेण्यात आली नाही. परिणामी, समस्या कायम आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामसेवकांनी कारवाई करण्यासाठी मोहीम सुरू करणार असल्याचे सांगितले होते, पण अद्याप माेहीम सुरू केली नाही. परिणामी, टिल्लू पंपाचा सर्रासपणे वापर होत आहे. गावातील नळकनेक्शनधारक नियमित पाणी कराचा भरणा करतात, पण टिल्लू पंप लावणाऱ्यांमुळे अनेकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याने, त्यांच्यातून रोष व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत सातत्याने या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने, गावकऱ्यांनी याची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.