शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

पूल नसल्याने शेतकऱ्यांची पायपीट

By admin | Updated: July 18, 2014 00:09 IST

खामखुरा ते माहुरकुडा या पांदण रस्त्यावरील नाल्यावर पुल नसल्याने दोन्ही गावातील शेतकऱ्यांना अर्धा कि.मी. अंतर कापण्यासाठी पाच कि.मी. पर्यंत पायपीट करावी लागते.

दत्तक ग्राम योजना : विकास कामे झालीच नाही
संतोष बुकावन - अर्जुनी/मोर.
खामखुरा ते माहुरकुडा या पांदण रस्त्यावरील नाल्यावर पुल नसल्याने दोन्ही गावातील शेतकऱ्यांना अर्धा कि.मी. अंतर कापण्यासाठी पाच कि.मी. पर्यंत पायपीट करावी लागते. अनेकदा पाठपुरावा करूनही गावातील समस्यांचा निवेदनाला केराची टोपली दाखविली जाते अशी व्यथा खामखुरा येथील गावकऱ्यांनी व्यक्त केली.
खामखुरा हे गाव अंधश्रध्देने पछाडलेले गाव म्हणून यावर्षी प्रकाशझोतात आले होते. हे गाव तत्पूर्वीच आ. राजकुमार बडोले यांच्या दत्तक ग्राम योजनेत आहे.या गावात अनेक समस्या आहेत. दत्तक ग्राम योजनेतील समस्यांचे आमदारांनी निराकरण केले नाही. खामखुरा हत्याकांडाचे वेळी आ. बडोले यांनी गावात भेट देणे अपेक्षित होते. ते जखमींना भेटण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे गेले मात्र त्यांनी गावात भेट देण्याचे सौजन्य बाळगले नाही अशी खंत सरपंच संजय राऊत यांनी व्यक्त केली.
खामखुरा या गावाची लोकसंख्या १९८४ आहे. शेती व शेतमजूरी हे रहिवाशांचे रोजगाराचे साधन आहे. या गावातील मजूरांना मग्रारोहयो अंतर्गत वर्षभरात किमान १०० दिवस रोजगार मिळाला नाही. केवळ २ कुटूंबाना मिळाला आहे. या गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंगणवाडी आहे. या अंगणवाडीनजीक विहीर आहे. या विहीरीतील पाणी दूषीत आहे. अंगणवाडीतील बालकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून सुमारे २०० मीटर अंतरावरून बोअरवेलचे पाणी आणावे लागते. वर्षाच्या प्रारंभी आ. बडोले यांनी पंचायत समिती कार्यालयात पाणी टंचाई समस्येवर आढाव बैठक घेतली. त्यात सरपंच राऊत यांनी दोन बोअरवेलचा प्रस्ताव मांडला. मात्र या प्रस्तावावर अद्यापही विचारच केला गेला नाही. या गावात विठ्ठल रुखमाई मंदीराजवळ १.५० लक्ष रुपयाची चावडी बांधकाम हेच आमदार निधीतून प्राप्त झाले. आमदारांकडून या व्यतिरीक्त कुठलाही निधी गावाच्या विकासासाठी देण्यात आला नाही.
येथे जलस्वराज्य योजनेंतर्गत नळयोजना आहे. मात्र याव्दारे गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे हे पाणी गावकरी केवळ इतर कामासाठीच वापरतात. नळयोजना सुध्दा अनेकदा बंद असते. पाण्याचे स्त्रोत्र म्हणून या गावात मोठ्या पाणीटाकीची व सार्वजनिक विहीरींची आवश्यकता आहे. याठिकाणी प्राथमिक स्वास्थ उपकेंद्र नाही. क्षुल्लक उपचारासाठी ९ किमी अंतरावरील कोरंभीटोला प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते. वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांची गैरसोय होते. येथे उपकेंद्र देण्याची मागणी आहे. येथील विद्यार्थी सायकल व पायदळ शाळेत जातात. गावात वाचनालय नाही, वनजमिनीवरील अतिक्रमण धारकांना ज्यांची नव्याने मोजणी झाली त्यांना पट्टे मिळण्याची प्रतिक्षा आहे.
या गावाच्या दत्तक ग्राम समितीच्या अध्यक्ष शितल लाडे या आहेत. त्या भाजपच्या महिला पदाधिकारी आहत. ज्यावेळी दत्तक ग्राम योजना अस्तित्वात आली. त्यावेळी या ावातील २२ मागण्यांचे निवेदन आमदारांना देण्यात आले होते. यापैकी केवळ ३ समस्यांचे निराकरण करण्यात आले. रामदास दुनेदार ते हनुमान जनबंधू यांचे घरापर्यंत दलीतवस्ती रस्त्याच्या बांधकामाची मागणी होती. यापैकी १२० मीटर रस्त्याचे बांधकाम झाले. निधी नसल्यामुळे सुमारे २०० मीटर रस्त्याचे काम अद्याप झाले नाही. खामखुरा ते महागाव रस्त्यावरील नाल्यावर पुलाचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे पावसाळ्यात बऱ्याचदा हा संपर्क तुटतो.
खडखडा तलावावर पाणघाटाची जुनी मागणी आहे. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आवारभिंत आवश्यक आहे. खामखुरा महागाव मार्गावर असलेल्या स्मशानघाटात बोअरवेलची आवश्यकता आहे. या ठिकाणी खामखुरा, हेटी, महागाव येथील पार्थीवावर अंत्यसंस्कार केले जातात. उन्हाळ्यात या नाल्याला पाणी राहत नसल्याने या तीन गावातील लोकांची गैरसोय होते.