शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांनी मांडल्या व्यथा

By admin | Updated: November 18, 2015 01:54 IST

आपल्या गृहजिल्ह्यात बदली होण्याची प्रतीक्षा करीत मागील १० ते १२ वर्षापासून परजिल्ह्यात सेवा देत असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

गोंदिया : आपल्या गृहजिल्ह्यात बदली होण्याची प्रतीक्षा करीत मागील १० ते १२ वर्षापासून परजिल्ह्यात सेवा देत असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. सोमवारी या शिक्षकांनी आपली व्यथा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेसमोर मांडली. त्यांची परिस्थिती ऐकून आणि केवळ काही अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे व गैरसमजामुळे त्यांना आतापर्यंत हा त्रास सहन करावा लागल्याचे लक्षात आल्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारीही सुन्न झाले. या शिक्षकांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची ग्वाही त्यांनी दिली.आंतरजिल्हा बदली प्रक्रिया काही वर्षापासून बंद असल्यामुळे शंभरावर शिक्षक गोंदिया जिल्हा परिषदेत पदस्थापना मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या शिक्षकांनी आंतरजिल्हा बदली कृती समितीमार्फत दि. १६ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण सभापती, शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. जिल्हा परिषद प्रशासनातील पदाधिकारी व अधिकारी यांनी आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांच्या व्यथा ऐकून त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करू, असे सकारात्मक आश्वासन दिले. जिल्हा परिषदेतील काही वर्षापासून रखडलेले केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक ही पदे पदवीधर, पदोन्नतीने येत्या २ महिन्यात भरून रिक्त होणाऱ्या जागेवर आंतरजिल्हा बदलीतून शिक्षकांना पदस्थापना देण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी सर्व प्रकारच्या जिल्हा बदलीवरील स्थगिती उठली असून पदोन्नती व संच मान्यता झाल्यावर तसेच सेवानिवृत्ती व निधनाने रिक्त जागेवर पदस्थापना देण्याचे आश्वासन दिले. दोन दिवसात आढावा घेणार असल्याचे पी.जी.कटरे म्हणाले. जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनीही अनुकूलता दर्शविली.(जिल्हा प्रतिनिधी) अन् अधिकारी-पदाधिकारी गहिवरलेअनेक वर्षापासून परजिल्ह्यात ४०० ते १६०० किमी अंतरावर कुटूंबापासून व घरापासून लांब कार्यरत असल्यामुळे त्यांना कौटुंबिक सुखापासून वंचित रहावे लागत आहे. कुणाचे आई-वडील आजारी आहेत तर कुणाचे मुलबाळ गावाकडे आहेत. हजारो किलोमीटर अंतरावर कार्यरत असल्यामुळे या शिक्षकांची सहा-सहा महिने भेट होत नाही. त्यामुळे आई-वडीलांचा वृध्दापकाळातील आजारपणाचा आधारच हरवला आहे. अनेक पती-पत्नी हजारे किमी अंतरावर कार्यरत असल्यामुळे त्यांच्यात घटस्फोटापर्यंत नाते ताणले गेले आहेत. काही शिक्षकांनी आई-वडील, नातेवाईक यांचा मृत्यू झाल्यावर त्यांचे अंत्यसंस्कार सुध्दा करता आले नाही. शिक्षकांच्या अशा अनेक समस्या ऐकून अधिकारी व पदाधिकारी गहिवरले.