शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रांचे बोगस परवाने

By admin | Updated: July 17, 2014 00:11 IST

खरीप हंगामात खताची मागणी मोठ्या प्रमाणात असते. दरवर्षी काही भागात खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून खताची अतिरिक्त दराने विक्री केली जाते. या हंगामी परिस्थितीचा लाभ घेण्याकरिता

गोंदिया : खरीप हंगामात खताची मागणी मोठ्या प्रमाणात असते. दरवर्षी काही भागात खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून खताची अतिरिक्त दराने विक्री केली जाते. या हंगामी परिस्थितीचा लाभ घेण्याकरिता कृषी केंद्र संचालकांना बनावट परवाने तयार करून देणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय होत आहे. या बनावट परवान्याच्या आधारावर कृषी साहित्याची विक्री करण्याच्या गोरखधंद्याला यामुळे उधान येण्याची शक्यता आहे.
धान उत्पादकांच्या या जिल्ह्यात जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात खतांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. जिल्ह्यात काही मोठे खते विक्रेते आहेत. किरकोळ कृषी केंद्र संचालकांना अधिकृत विके्रत्यांकडून खताची उचल करण्याकरिता कृषी विभागाचा परवाना व पंचायत समितीकडून ‘ओ’ फॉर्मची गरज असते. दरवर्षी खताच्या विक्रीत वाढत होत आहे. यासोबत कृषी केंद्र संचालकांची संख्यादेखील वाढत आहे. जे खत विक्रेते अधिकृत विक्रेत्याकडून खताची उचल करतात, त्यांना एमएआरपीच्या दराने खताची विक्री करावी लागते. मात्र दोन-तीन वर्षांचा इतिहास पाहता खताची ऐन हंगामाच्या काळात टंचाई निर्माण केली जाते. यासाठी काही मोठे खत विक्रते विशेष भूमिका पार पाडतात.
ग्रामीण भागातील काही लोकांनी कृषी केंद्राचा बनावट परवाना तयार करून कृषी केंद्रे थाटली आहेत. या कृषी केंद्रांची कृषी विभागाकडे अधिकृतपणे नोंद नसल्याने केंद्र संचालक मोठ्या खत विक्रेत्यांशी जुळवाजुळव करून खताची उचल करतात व एमआरपीपेक्षा अधिक दराने विक्री करतात.
विशेष म्हणजे टंचाईच्या काळातदेखील या खते विक्रेत्यांकडे खताचा स्टॉक उपलब्ध असतो. यातून जो नफा प्राप्त होतो तो मोठे खते विक्रेते व लहान कृषी केंद्र संचालक यांच्यात वाटप केला जात असल्याचे बोलल्या जाते. हा प्रकार बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. यातून बनावट कृषी केंद्राचे परवाने तयार करायचे व चार महिन्यांच्या हंगामात भरपूर नफा कमवायचा व मोकळे व्हायचे, हा प्रकार समोर आल्याचे एका मोठ्या खत विक्रेत्याने सांगितले. यात काही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याचे बोलल्या जाते. मात्र या बनावट कृषी परवाने तयार करण्याच्या प्रकारात शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जात आहे. या बोगस परवाने तयार करणाऱ्यांना हुडकून काढून वेळीच त्यांच्यावर कारवाई करण्याचे आव्हान कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)