लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पणजी ते बेती जलमार्गावर शुक्रवारी 'कुशावती' आणि 'साळावली' या नव्या दोन अत्याधुनिक फेरीबोटींचे लोकार्पण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या फेरीबोटींमुळे पणजी ते बेती दरम्यानचा प्रवास २ ते ३ मिनिटांत पूर्ण होणार आहे.
या फेरीबोटींमध्ये प्रत्येकी १५० प्रवासी, ९ चारचाकी वाहने वाहण्याची क्षमता आहे. अत्याधुनिक फेरीबोटींमुळे प्रवास आता अधिक सुरक्षित व सुकर होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या नव्या फेरीबोटींचे लोकार्पण करण्यात आले.
नदी परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, की 'कुशावती' व 'साळावली' या अत्याधुनिक फेरी रो रो फेरीबोटीच्या धर्तीवर पणजी ते बेती जलमार्गावर सुरु करण्यात आल्या असून यामुळे प्रवाशांना जलद व सुरक्षित प्रवास करता येणार आहे. फेरीबोटींतून प्रवासी तसेच वाहनांची क्षमता वाढवली आहे. त्यात स्वच्छतागृहाचीही सुविधा आहे.
यावेळी साळगावचे आमदार केदार नाईक, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा रेश्मा बांदोडकर, नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमराजे भोसले व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आमदार केदार नाईक यांच्या प्रयत्नांना यश
दिवाडी येथील जलमार्गावरही डिसेंबर पर्यंत रो रो फेरीबोटीची सेवा सुरु केली जाईल. याशिवाय नदी परिवहन खात्याच्या ताफ्यात आणखीन दोन नव्या फेरीबोटींची भर पडेल. सध्या कार्यरत असणाऱ्या जुन्या फेरीबोटींची जागा नव्या फेरीबोटी घेतील. पणजी ते बेती या मार्गावर सुरु केलेल्या नव्या फेरीबोटींचे श्रेय साळगावचे आमदार केदार नाईक यांना जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्याचे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.
Web Summary : Chief Minister inaugurated two new ferries, 'Kushavati' and 'Salavali', for the Panaji-Betim route. These ferries, accommodating 150 passengers and nine vehicles each, will significantly reduce travel time. The ferries offer enhanced safety and convenience, marking a boost in river transport. Local leaders lauded the initiative.
Web Summary : मुख्यमंत्री ने पणजी-बेती मार्ग के लिए दो नई फेरी 'कुशावती' और 'सालावली' का उद्घाटन किया। ये फेरी 150 यात्रियों और नौ वाहनों को ले जाने में सक्षम हैं, जिससे यात्रा का समय कम हो जाएगा। नौकाएँ बेहतर सुरक्षा और सुविधाएँ प्रदान करती हैं, जिससे नदी परिवहन को बढ़ावा मिलेगा।