शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१२ गावांना वगळल्याने चेन्ना प्रकल्पाला सहमतीस अडचण

By admin | Updated: September 21, 2016 02:23 IST

मुलचेरा तालुक्यातील चेन्ना या प्रकल्पात १२ गावांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे.

स्थानिकांशी संवाद साधा : १०० एकरावरील आदिवासींची उपजीविका नष्ट होण्याची भीती
गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील चेन्ना या प्रकल्पात १२ गावांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. वगळलेल्या गावांना समाविष्ट करून पाण्याची सोय होत असल्यास या परिसरातील तिन्ही ग्रामपंचायती प्रकल्पाला मान्यता देऊ शकतील, अशी परिस्थिती असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

१९७७ मध्ये मुखडी गावालगत किमान ३५० ते ४०० हेक्टर जंगल परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले होते. तेव्हापासून वनजमिनीचा प्रस्ताव प्रलंबित राहिला. २०१६ मध्ये या प्रकल्पाला पुन्हा मंजुरी मिळाली व सर्वेक्षणाची रूपरेषा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. मुलचेरा तालुक्यात १८ गावांना या प्रकल्पाद्वारे पाण्याची सोय होणार आहे. प्रकल्पाच्या कालव्याच्या बाजुला असलेल्या तीन ग्रामपंचायतमधून दोन ग्रामपंचायती या पेसा प्र क्षेत्रात मोडणाऱ्या आहे. एकूण १२ गावांना प्रकल्पातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्या गावातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ होणार नाही. त्यामुळे या प्रकल्पाला अनुमती मिळण्यास ग्रामस्थांचा विरोध असल्याची भूमिका दिसून येत आहे. प्रकल्पाच्या उभारणीला विरोध नाही. मात्र प्रकल्पात वगळण्यात आलेले गाव समाविष्ट करावे, त्यांच्या पर्यंतही पाणी पोहोचले पाहिजे, याचे नियोजन करावे, अशी मागणी जोर धरून आहे. प्रकल्प ज्या ठिकाणी होणार आहे, तेथे किमान १०० एकर जमिनीवर आदिवासींची उपजीविका अवलंबून आहे. शेतीशिवाय दुसरे कोणतेही उपजिविकेचे साधन या भागात नाही. त्यामुळे आदिवासी समाजाला या प्रकल्पामुळे बाधा निर्माण होईल, अशी भिती वाटत आहे. त्यामुळे विद्यमान सरकार, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांना जनतेशी सुसंवाद साधून मार्ग काढावा लागणार आहे. त्याशिवाय या प्रकल्पाला स्थानिक ग्रामसभांची मंजुरी मिळणे कठीण आहे. यासाठी आता नव्याने प्रयत्न करून सर्वच स्तरावर नागरिकांशी व ग्रामसभांशी चर्चा होणे आवश्यक ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)