शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

बनावट खते, बियाणे विकाल तर खबरदार; 39 दुकानांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 05:00 IST

बहुतांश शेतकरी अशिक्षित व साधेभाेळे राहतात. याचा गैरफायदा दुकानदारांकडून घेतला जाते. कधी-कधी बाेगस खते, बियाणे, कीटकनाशके विकली जातात तर कधी-कधी अधिक दराने या सर्व वस्तूंची विक्री हाेते. या बाबींवर नियंत्रण राहावे, यासाठी कृषी विभागामार्फत वेळाेवेळी तपासण्या केल्या जातात. गडचिराेली जिल्ह्यात तपासणीसाठी प्रत्येक तालुकास्तरावर एकतर जिल्हास्तरावर एक असे एकूण १३ पथके आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : खते, बियाणे, कीटकनाशके विकताना शेतकऱ्यांची फसवणूक हाेऊ नये, यासाठी कृषी विभागामार्फत दुकानांची वेळाेवेळी तपासणी केली जाते. यावर्षीच्या आर्थिक वर्षात जिल्हाभरातील २ हजार ३३ तपासण्या करून ९२२ नमुने घेण्यात आले. त्यात ३९ दुकानदारांचे नमुने अप्रमाणित निघाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बहुतांश शेतकरी अशिक्षित व साधेभाेळे राहतात. याचा गैरफायदा दुकानदारांकडून घेतला जाते. कधी-कधी बाेगस खते, बियाणे, कीटकनाशके विकली जातात तर कधी-कधी अधिक दराने या सर्व वस्तूंची विक्री हाेते. या बाबींवर नियंत्रण राहावे, यासाठी कृषी विभागामार्फत वेळाेवेळी तपासण्या केल्या जातात. गडचिराेली जिल्ह्यात तपासणीसाठी प्रत्येक तालुकास्तरावर एकतर जिल्हास्तरावर एक असे एकूण १३ पथके आहेत. शेतकऱ्यांकडून तक्रार प्राप्त हाेताच संबंधित दुकानांची तपासणी केली जाते. 

२२ जणांवर खटले दाखल५ बियाणे विक्रेते, १३ खत विक्रेते व ४ कीटकनाशके विक्रेत्यांवर कृषी विभागाने न्यायालयात खटले दाखल केले आहेत तसेच १७ बियाणे विक्रेते, १८ खत विक्रेते व ४ कीटकनाशके विक्रेत्यांना ताकीद देण्यात आली आहे. नाेटीस नंतरही सुधारणा न झाल्यास संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द हाेते.

एका दुकानाचा परवाना केला निलंबित-    कृषी विभागाने केलेल्या पाहणीत एका दुकानदाराच्या दुकानातील खत अप्रमाणित असल्याचे आढळून आले. संबंधित दुकानदाराचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. -    कृषी विभाग वेळाेवेळी तपासण्या करीत असल्याने दुकानदार बाेगस बियाणे किंवा खते विकत नाही. मात्र शेतकऱ्यांकडून अधिकचे पैसे वसूल करतात. बियाण्यांच्या कंपन्यांनी जेवढी किंमत छापली आहे, त्यापेक्षा अधिक किमतीने बियाण्यांची विक्री करू नये, असा नियम आहे. मात्र कंपन्या दुकानदारांना जवळपास ५० टक्के मार्जिन देऊन किंमत लिहीतात. त्यामुळे बियाण्यांच्या किमतीत दुकाननिहाय फरक दिसून येते.

१३ लाखांचे बियाणे जप्त

अहेरी तालुक्यातील शेतकऱ्यांना कापसाचे बाेगस बियाणे पुरविले जात असल्याची गाेपनीय माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. अधिकाऱ्यांनी दाेन ठिकाणी धाड टाकून बियाणे जप्त केले. मागील सहा महिन्यांच्या कालावधीत १३ लाख ५८ हजार रुपयांचे बियाणे जप्त करण्यात आले.  महाराष्ट्रात काही कापुस बियाण्यांना प्रतिबंध घातला आहे, असे बियाणे विकल्या जातात.

 

टॅग्स :agricultureशेती