शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे ४६ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 6:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शेतकऱ्यांनी वीज बिलाचा भरणा करावा, यासाठी शासनाने सवलतीच्या विविध योजना राबविल्यानंतरही जिल्ह्यातील जवळपास १९ ...

ठळक मुद्दे२० हजार शेतकरी : महिन्याला सव्वा कोटी युनिट विजेचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांनी वीज बिलाचा भरणा करावा, यासाठी शासनाने सवलतीच्या विविध योजना राबविल्यानंतरही जिल्ह्यातील जवळपास १९ हजार शेतकऱ्यांकडे ४५ कोटी ८९ लाख ३१ हजार १९६ रुपयांची थकबाकी आहे. विशेष म्हणजे दुष्काळी परिस्थिती असताना अद्याप शेतकऱ्यांकडून वीज बिलाची थकबाकी सक्तीने वसूल न करण्याबाबत कोणताही आदेश मिळालेला नाही.गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील कन्नमवार जलाशय वगळता एकही मोठा सिंचन प्रकल्प नाही. मामा तलाव, बोड्यांच्या माध्यमातून खरीप हंगामातील धानपिकाला आकस्मिक स्थितीत सिंचन उपलब्ध होते. सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना अनुदानावर सिंचन विहिरी, शेततळे उपलब्ध करून दिले. विहिरींमध्ये कृषिपंप लावून सिंचन करण्यासाठी वीज पुरवठा व कृषिपंपांची मागणी वाढली. शासनानेही शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांच्या शेतापर्यंत वीज खांब नेऊन पोहोचले. परंतू त्या वीज बिलाची रक्कम नियमितपणे भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण १९ हजार ८१४ वीज कृषिपंपधारक शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना शासनामार्फत अत्यंत कमी दरात वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाते. जिल्हाभरातील शेतकरी दर तीन महिन्याला जवळपास सव्वा कोटी युनिट विजेचा वापर करतात. तीन महिन्याचे बिल जवळपास तीन ते साडेतीन कोटीच्या जवळपास राहते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे जुनी थकबाकी ३४ कोटी ८५ लाखांवर पोहोचली आहे. शेतकºयांनी थकीत वीज बिल भरावे, यासाठी शासनाने विविध योजना राबविल्या. मात्र शेतकऱ्यांकडे थकीत वीज बिल कायम आहे. उलट वीज बिलाचा आकडा वाढतच चालला आहे. भविष्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.नव्याने सत्तारूढ महाराष्ट्र आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काय-काय करणार याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकºयांना सवलतीच्या दरात वीज देण्यासोबतच शेतमालाला भाव देण्याची गरज व्यक्त होत आहे.व्याज पोहोचले ११ कोटींवरमहावितरणच्या नियमानुसार वीज बिल थकीत असेल तर त्यावर काही प्रमाणात व्याज आकारले जाते. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे सप्टेंबर महिन्यापर्यंत सुमारे ३४ कोटी ८५ लाख २१ हजार रुपयांची थकबाकी होती. या थकबाकीवर सुमारे ११ कोटी ४ लाख ९ हजार रुपयांचे व्याज झाले आहे. काही शेतकऱ्यांनी मागील तीन ते चार वर्षांपासून वीज बिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे त्यांच्याकडील थकबाकी व त्यावरील व्याज वाढतच चालला आहे.दुष्काळामुळे वीज बिल वसुली रखडलीखरीप हंगामातील धानपीक भरण्याच्या मार्गावर असताना जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. अनेकांच्या शेतात पाणी शिरल्याने धानपिकाचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांचा थकीत वीज बिलासाठी वीज पुरवठा खंडित करणे योग्य होणार नसल्याने वीज पुरवठा खंडित करण्याचे धोरण काही काळ लांबणीवर टाकले असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र जे शेतकरी वीज बिल भरणार आहेत, त्यांच्याकडून वीज बिल स्वीकारले जाणार आहे.

टॅग्स :electricityवीजagricultureशेती