शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१९८६ पासून भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळाली नाही

By admin | Updated: September 21, 2016 02:27 IST

अहेरी तालुक्यातील वन विकास महामंडळातील मार्र्कंडा वन प्रकल्प विभागातील रोजंदारी मजुरांची भविष्य निर्वाह निधीची कपात

वन विकास महामंडळाकडे रोजंदारीवर केले काम : तब्बल ३० वर्षांपासून रखडला प्रश्न
आलापल्ली : अहेरी तालुक्यातील वन विकास महामंडळातील मार्र्कंडा वन प्रकल्प विभागातील रोजंदारी मजुरांची भविष्य निर्वाह निधीची कपात केलेली रक्कम देण्यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सहायक वन व्यवस्थापक टी. जी. तायडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे की, वन विकास महामंडळातील मार्र्कंडा वन प्रकल्पात १९८६ पासून बांबू कटाई, फाटे कटाई व रोजंदारीवर काम करीत असताना महामंडळाने १२ टक्के दराने भविष्य निर्वाह निधी कापला. त्याची साधी पावती मजुरांना दिलेली नाही. रोजंदारी रजिस्टरवर अंगठे लावण्यात येत होते. याची चौकशी करून ३० वर्षांपासून प्रलंबित असलेली रक्कम देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचे मुस्ताक हकीम, चंद्रकांत बेझलवार, राजू सलुजा, अज्जु पठाण, सलीम शेख, युवक काँग्रेसचे अहेरी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बालाजी गावडे, बिरजू गावडे, बंडू सिडाम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

वनहक्काबाबतच्या तक्रारींची दखलच घेतली जात नाही
अहेरी तालुक्यात आदिवासी व गैरआदिवासी नागरिकांच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या केंद्र व राज्य योजना संनियंत्रण समितीचे जनसेवक मुस्ताक बब्बू हकीम यांनी केला आहे.
या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अहेरी तालुक्यातील वेलगूर टोला येथील वनहक्काचे प्रकरण २००८ मध्ये सादर करण्यात आले होते. ते गहाळ झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही आदिवासी शेतकऱ्यांना पट्टे मिळाले नाही. तर येलचील (कलेम) येथील आदिवासी शेतकऱ्यांना २०१२ मध्ये वनहक्काचे पट्टे मिळाले. परंतु चार वर्ष होऊनही त्यांच्या सातबाऱ्यावर नोंद घेण्यात आली नाही. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही न्याय मिळालेला नाही. अहेरी तालुक्यातील नवेगाव, तानबोडी, शिवलिंगपूर येथील गैरआदिवासी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या वनहक्क समितीकडे प्रस्ताव दिला. परंतु तो अजुनही निकाली निघालेला नाही. अहेरी तालुक्यात निराधार लोकांची रक्कम सहकारी बँकांनी हडपल्याची तक्रार तहसीलदारांकडे देण्यात आली होती. परंतु बँकेवर अजुनही कारवाई झालेली नाही. अहेरी तालुक्यातील सहा जिल्हा परिषद क्षेत्रापैकी केवळ एकाच क्षेत्रातील नागरिकांना संपूर्ण योजनांचा लाभ दिला जात आहे, असा आरोपही हकीम यांनी केला आहे.